
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे म्हणजे तुम्ही काय खाता काय पिता. हिवाळ्यात आहारात निरोगी गोष्टी खाण्यावर भर द्या, ज्यामुळे आरोग्य चांगले राहिल.

सध्याच्या धावपळीच्या जीवनात सकाळी नाश्ता करायला कोणाकडे वेळ नाहीये. सकाळी गडबडीत नाश्ता करणे शक्य होत नाही. अशावेळी तुम्ही झटपट होणारा हेल्दी नाश्ता करू शकता.

डॉक्टरही अनेकदा म्हणतात की, शरीरासाठी सकाळचा नाश्ता सर्वात महत्वाचा असतो. सध्या मार्केटमध्ये रताळे चांगली येत आहेत. अशावेळी रताळ्यापासून तयार केलेला नाश्ता आपण खा शकता.

रताळी उकडण्यासाठी काही मिनिटे लागतात. उकडलेल्या रताळ्याचे साल काढा आणि त्याला बारीक करा. त्यामध्ये हिरवी मिरर्ची आणि बेसिक मसाले मिक्स करा.

हे मिश्रण एकजीव करा आणि त्याच्या टिक्की तयार करा. या टिक्की तव्यावर गरम करा. विशेष म्हणजे आपण प्रवासामध्येही हे आरामात खाऊ शकता.