
बीसीसीआयने विजेत्या संघाला 125 कोटी देण्याची घोषणा केली. त्यामुळे संघातील 15 खेळाडूंना पाच, पाच कोटी मिळणार आहे. या पंधरा खेळाडूंमध्ये तीन खेळाडू असे आहेत, जे एकही सामना खेळले नाही.

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनाही एकूण बक्षीस रकमेपैकी ५ कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले जाणार आहेत. 'द इंडियन एक्स्प्रेस'च्या वृत्तानुसार, उर्वरित कोर कोचिंग ग्रुपला प्रत्येकी 2.5 कोटी रुपये मिळतील.

भारतीय संघाच्या वरिष्ठ निवड समितीच्या पाच सदस्यांना प्रत्येकी एक कोटी रुपये दिले जातील. त्यामध्ये अजित आगरकरचाही समावेश आहे.

संघाचे चार राखीव खेळाडू रिंकू सिंग, शुभमन गिल, आवेश खान आणि खलील अहमद यांनाही प्रत्येकी एक कोटी रुपये मिळणार आहे.

भारतीय संघात असणारे यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन आणि युजवेंद्र चहल हे संघात होते पण त्यांनी एकही सामना खेळला नाही. परंतु त्यांना प्रत्येकी 5 कोटी रुपये मिळणार आहेत.