
टीम इंडिया आणि इंग्लंडमधील तिसऱ्या कसोटी सामन्याआधी एक वाईट बातमी समोर आली आहे. या बातमीमुळे टीम इंडियाच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. सरावादरम्यान स्टार खेळाडू दुखापती झाला आहे.

तिसऱ्या कसोटीमध्ये कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. मात्र दुसरीकडे मोठे खेळाडू दुखापतीन त्रस्त आहेत. के.एल. राहुल आणि रविंद्र जडेजा आधीच बाहेर आहेत.

बीसीसीआयनेही उर्वरित तीन कसोटीसाठी संघाची घोषणा केलेली नाही. ही घोषणा करण्याआधी आता एका स्टार खेळाडूच्या खेळण्याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत.

हा स्टार खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून श्रेयस अय्यर आहे. अय्यर याच्या खेळण्याबाबत संभ्रम आहे. मेडिकल टीमने त्याला आता फिट सांगितलं आहे. मात्र तरूसुद्धा 15 तारखेपर्यंत काहीच नक्की नाही.

सरावादरम्यान परत त्याची दुखापत वाढली तर त्याला बाहेर बसावं लागणार आहे. त्यामुळे बीसीसीआयला प्लॅन बी तयार ठेवावा लागणार आहे.