हे स्थानक दोन राज्यात विभागलेले, बाकड्याचा एक भाग एका राज्यात तर दुसरा भाग दुसऱ्या राज्यात, कोणते हे स्थानक ?
भारतीय रेल्वे जगातील चौथे मोठे रेल्वे नेटवर्क मानली जाते. भारतात दररोज दोन ते अडीच कोटी लोक रेल्वेने प्रवास करतात. ही जगातील काही देशांची लोकसंख्या आहे.भारतात काही रेल्वे स्थानके दोन राज्यात विभागली गेली आहेत. भाषावार प्रांतरचनेच्या वेळी असे घडले होते.
1 / 5

भारतात अनेक रेल्वे स्थानके आहेत. त्यातील काही खास वैशिष्ट्यांमुळे ओळखली जातात.
2 / 5

महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांच्या सीमेवर वसलेले नवापूर रेल्वे स्थानक एक अनोखे स्थानक आहे.
3 / 5

या स्थानकाचा अर्धा भाग महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात तर भाग गुजरातमधील तापी जिल्ह्यात मोडतो.
4 / 5

या स्थानकातील एका बेंचवर जर चार जण बसले तर दोन जण गुजरात तर दोन जण महाराष्ट्रात बसतात. दोन राज्यांच्या सीमेवर असूनही येथे कोणत्याही प्रकारचा प्रशासकीय अडथळा येत नाही.
5 / 5

याच प्रकारे राजस्थान आणि मध्यप्रदेश यांच्या सीमेवरील भवानी मंडी रेल्वे स्थानक हे देखील अशाच प्रकारे दोन राज्यात वाटले गेले आहे
Follow Us