
बॉलीवूड अभिनेता संजय दत्त सध्या 'KGF 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे. प्रशांत नील दिग्दर्शित आणि यश कुमार स्टार 'KGF: Chapter 2' बॉक्स ऑफिस धुमाकूळ घातला आहे. फुल्ल अॅक्शनपट, ड्रामा असलेला हा चित्रपट चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.

संजूबाबा सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अलीकडे, त्याला त्याचे भूतकाळातील दिवसांची आठवण झाली होती. जेव्हा लोक त्याला दिवस 'चरसी' म्हणायचे . मात्र आयुष्याला लागलेला हा शिक्का काढीन टाकण्यासाठी त्याला अत्यंत कठोर परिश्रम घ्यावे लागले. मग कुठे जाऊन तो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करू लागला.

या आठवणी बाबत बोलताना संजूबाबू म्हणतो की , काही आठवणी अशा असतात की त्या आयुष्यभर लक्षात राहतात. आयुष्यात एक वेळ अशी आली की तो ट्रॅकमध्ये हरवला आणि मग त्याच ट्रॅकवर परत येण्यासाठी त्याला खूप मेहनत करावी लागली. त्यांनी एका मुलाखतीदरम्यान या गोष्टींचा उल्लेख केला.

संजूबाबू म्हणाला की त्यांच्या आयुष्यातील 10 वर्षे मी एकतर बाथरूममध्ये किंवा माझ्या खोलीत होतो. मला शूटिंगमध्ये अजिबात रस नव्हता. सर्व काही बदलले होते.

आपल्यावर पडलेला शिक्का पुसून टाकण्यासाठी काहीतरी करणे आवश्यक होते, मग मी जिम करायला सुरुवात केली , मग लोक मला म म्हणू लागले काय बॉडी बनवली आहे.