Skin Care : सनस्क्रीनसंदर्भातील या मिथकांवर तुमचा तर विश्वास बसला नाही ना ?
उन्हाळा असो वा हिवाळा प्रत्येक ऋतूमध्ये सनस्क्रीन लावण्याचे रूटीन फॉलो केले पाहिजे. तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात दिवसातून दोनदा आणि उन्हाळ्यात दर तीन तासांनी सनस्क्रीन लावावे. त्याच्याशी संबंधित या मिथकांवर लोक सहज विश्वास ठेवतात.

सनस्क्रीन केवळ अतिनील किरण आणि सूर्यप्रकाशापासून आपल्या त्वचेचे रक्षण करत नाही तर चेहऱ्यावर चमक आणण्याचेही काम करते. उन्हाळा असो वा हिवाळा प्रत्येक ऋतूमध्ये सनस्क्रीन लावण्याचे रूटीन फॉलो केले पाहिजे. पण लोक त्याच्याशी संबंधित काही मिथकांवर सहज विश्वास ठेवतात. त्याबद्दल जाणून घ्या...

चेहऱ्यावर सनस्क्रीन लावणे ही लोकांची सवय बनली आहे, परंतु बरेच लोक असं मानतात की सनस्क्रीन फक्त उन्हाळ्यातच लावावे. प्रत्येक ऋतूमध्ये त्वचेवर सनस्क्रीन लावणे आवश्यक असते.

आपल्यापैकी बऱ्याच लोकांना वाटते की, हिवाळ्याच्या हंगामामध्ये सनस्क्रीन लावण्याची काही गरज नाही. मात्र, हिवाळ्यातही निरोगी त्वचा हवी असेल तर त्यासाठी सनस्क्रीन लावले पाहिजे.

ज्यांच्या त्वचेचा रंग गडद आहे त्यांना सनस्क्रीन लावण्याची गरज नाही असाही हा गैरसमज पसरला आहे. शरीरातील मेलॅनिनच्या अतिरिक्ततेमुळे त्वचेचा रंग गडद होऊ शकतो, परंतु अतिनील प्रकाशामुळे होणारे नुकसान प्रत्येक त्वचेला सहन करावे लागते.