
टीम इंडिया आणि इंग्लंडमधील मालिका सुरू असताना बीसीसीआयने केंद्रीय वार्षिक करार केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. या दोन्ही खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळण्याकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे त्यानंतर या दोन्ही खेळाडूंवर ही कारवाई केली गेली आहे.

श्रेयस अय्यरही इंग्लंडसोबत खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाचा भाग होता पण आता त्यालाही बीसीसीआयच्या केंद्रीय करारातून वगळण्यात आले आहे.

इशान किशनने दक्षिण आफ्रिकेसोबत खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतून विश्रांतीची मागणी केली होती. त्यानंतर ईशान किशनला बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला होता.

बीसीसीआयच्या नियमांनुसार, अय्यर आणि किशन यांनी ठराविक कालावधीत 3 कसोटी सामने किंवा 8 एकदिवसीय किंवा 10 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. तर दोन्ही खेळाडूंना बीसीसीआयच्या केंद्रीय करारामध्ये समाविष्ट केलं जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांच्याप्रमाणेत आता सर्फराज खान आणि ध्रुव जुरेल यांचीही पाचव्या कसोटी सामन्यानंतर करारामध्ये समाविष्ट केलं जावू शकतं.