
भारतीय उपखंडात भारतीय संस्कृती जुनी आहे. ही समृद्ध सभ्यता आहे. जगातील अनेक साम्राज्यांना भारताची मोहिनी होती. इतिहासाच्या पानावर भारताला आर्यावर्त, भारतवर्ष, जंबूद्वीप,सप्तसिंधु, भारतखंड,द्रविडदेश, प्रजापती, सनातन भूमी अशा विविध नावांनी ओळखले जायचे. सध्या भारताला हिंदूस्थान, इंडिया नावाने ओळखले जाते.

जगातील सर्वच देश सध्या भारताला इंडिया नावाने ओळखतात. पण आपला शेजारचा देश चीनची संस्कृती पण अत्यंत जुनी आहे.

भारताविषयी या देशात अनेकांना आकर्षण होते. ते भारताच्या शोधासाठी अनेक आव्हानं पार करून आली. पण ही लोक भारताला कोणत्या नावानं ओळखतात तुम्हाला माहिती आहे का?

चीनमध्ये भारताला जुन्या काळी “तिआनझु” (Tianzhu) असं म्हटल्या जायचे. हे नाव बौद्ध परंपरेशी जोडल्या गेले आहे. त्याचा अर्थ होतो स्वर्गीय भूमी, मानव जातीसाठी आदर्श ठिकाण. भारतातून बौद्ध धर्म चीनमध्ये पोहचला. तेव्हा चीनी लोक भारताला तिआनझू असे म्हणत.

महान सम्राट अशोक याच्या काळात बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसारासाठी चीनमध्ये दूत पाठवण्यात आले होते. त्यांनी बौद्ध पंरपरा, संस्कृती, ज्ञानाचा तिथे प्रसार आणि प्रचार केला.

भारताचे अजून एक नाव चीनमध्ये प्रचलित आहे. इंडू (Yindu) असे ते नाव आहे. बहुधा ते सिंधु या नावाचा अपभ्रंश असावे. इंडू हे आताचा चीनमध्ये भारताविषयीचे सर्वात जुने नाव आहे.