
वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांचा बवाल हा चित्रपट नुकताच ओटीटीवर रिलीज झालाय. विशेष म्हणजे या चित्रपटाला चांगला प्रतिसाद हा मिळताना दिसतोय. आता यावरच एक पोस्ट वरुण धवन याने शेअर केलीये.

वरुण धवन याने आपल्या पोस्टमध्ये बवाल चित्रपटाला प्रेम दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले आहेत. इतकेच नाही तर वरुण धवन याने मिळणाऱ्या प्रतिक्रिया खूप जास्त चांगल्या असल्याचे देखील म्हटले आहे.

वरुण धवन म्हणाला की, मला यापूर्वी चित्रपटासाठी कधीच इतके जास्त फोन आले नाहीत जे आता येत आहेत. मी खरोखरच सर्वांचा आभारी आहे. वरुण धवनची पोस्ट व्हायरल होत आहे.

सर्वांनी आपल्या कुटुंबियांसोबत बवाल चित्रपट बघावा, असेही वरुण धवन म्हणताना दिसत आहे. पहिल्यांदाच वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांची जोडी एकसोबत काम करताना दिसली.

विशेष म्हणजे बवाल या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना वरुण धवन आणि जान्हवी कपूर हे दिसले आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना देखील दिसत आहे.