
भारतात हिंदू धर्मामध्ये वास्तूशास्त्राला खूप महत्त्व आहे. वास्तूशास्त्रात घराच्या दरवाजाबाबत काही नियम सांगितलेले आहेत. या नियमांचे पालन न केल्यास तुमच्या घरात नकारात्मक उर्जा येऊ शकते. त्यामुळे हे नियम कोणते आहेत, ते जाणून घेऊ या...

वास्तूशास्त्रानुसार तुमच्या घराचे मुख्य द्वार चुकीच्या दिशेने असेल किंवा दरवाजा चुकीच्या दिशेने उघडत असेल तर त्याला दरवाजाशी संबंधित वास्तू दोष म्हटले जाते. वास्तूशास्त्रानुसार दक्षिण दिशा, दक्षिण पूर्व दिशा, दक्षिण पश्चिम दिशेला असलेला दरवाजा हा वास्तूदोषाचे कारण असू शकते.

या दिशांनी घराचा दरवाजा असेल तर घरात नाकारात्मकता येते, अशी मान्यता आहे. वास्तूशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा तुटलेला असणे हादेखील वास्तूदोष आहे. घराचा दरवाजावार घाण असणे हेदेखील वास्तूदोषाचे कारण असू शकते.

वास्तूशास्त्राच्या नियमानुसार घराच्या मुख्य दरवाजाची रुंदी ही लांबीपेक्षा नेहमी दुप्पट असायला हवी. वास्तूशास्त्रानुसार मुख्य दरवाजाच्या आत समोरासमोर दुसरा दरवाजा नसावा. घराच्या मुख्य दरवाजाजवळ सफाई ठेवावी. मुख्य दरवाजावर प्रकाश असायला हवा.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.