
अनेकवेळा रात्रभर पुरेशी झोप झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आळस येत राहतो. त्याचे कारण व्हिटॅमिनची कमतरता आहे. त्यामुळे सकाळी उठल्यावर दिवसभर आळशीपण वाटते. दिवसभर थकवा जाणवतो.

शरीरातील जीवनसत्त्वे आणि खनिजांचे असंतुलनाचा हा परिणाम आहे. शरीरात अनेक जीवनसत्त्वे आहेत ज्यांच्या कमतरतेमुळे जास्त झोप लागते. जेव्हा शरीरात व्हिटॅमिन डी कमी होऊ लागते तेव्हा झोपेची समस्या निर्माण होते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे दिवसभर थकवा, अशक्तपणा आणि जास्त झोप येऊ शकते.

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे शरीरात कॅल्शियम फॉस्फरसची कमतरता देखील वाढते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊ लागते आणि दिवसभर आळशीपणा जाणवतो. सर्व वेळ झोपून राहवे, अशी भावना होते. त्यामुळे शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता होऊ देऊ नका.

व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता हे देखील जास्त झोपेचे एक प्रमुख कारण असू शकते. व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेमुळे जास्त झोप लागते. व्हिटॅमिन बी12 कमी असल्यास न्यूरोलॉजिकल आणि मानसिक समस्या विकसित होण्याचा धोका वाढतो.
