
हृदयविकाराचा झटका आला की अगोदर सगळेजण घाबरतात. नेमकं काय करावं? हे कोणालाही समजत नाही. मात्र हृदयविकाराचा झटका आल्यानंतर वेळीच योग्य ती पावलं उचलली तर त्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो. त्यामुळे कोणालाही हृदयविकाराचा झटका आल्यावर नेमके काय करावे? हे जाणून घेऊ या...

हृदयविकाराचा झटका आल्यावर त्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो की नाही हे अनेक घटकांवर अवलंबून असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्यावर त्याला लवकरात लवकर वैद्यकीय मदत मिळणे फार गरजेचे आहे. जेवढी लवकर वैद्यकीय मदत मिळणार, त्या व्यक्तीचा जीव वाचण्याची शक्यताही तेवढीच जास्त असते.

हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू होण्याचा दर हा 5 ते 10 टक्के आहे. संबंधित व्यक्तीला हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणं दिसू लागली की त्याला लगेच रुग्णालयात दाखल करावे. गोल्डन आवरमध्ये त्या व्यक्तीला उपचार मिळाला, तर जीव वाचतो. त्यामुळेच हृदयविकाराचा झटका आला की गोल्डन आवरचा काळ फार महत्त्वाचा असतो.

यासोबत हृदयविकाराचा झटका येऊ नये यासाठी नियमितपणे चाचण्या करणे गरजेचे आहे. सोबतच जीवनशैलीमध्ये बदल करणेही गरजेचे आहे. हृदयविकाराचा झटका आला की रुग्णाला लगेच सीपीआर द्यावा. यामुळेही रुग्णाचा जीव वाचू शकतो.

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)