
अंतराळातील विश्व हे मोठं चमत्कारिक असते. तिथे कधी काय होईल, हे सांगता येत नाही. विशेष म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्तीचा प्रभाव नसल्याने अंतराळात सर्व गोष्टी फारच काळजीपूर्वक कराव्या लागतात. अंतराळात गेल्यावर जेवण करायचे असल्यास तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागते.

अनेकदा पृथ्वीवर फारच चविष्ट वाटणारे पदार्थ अंतराळात वेगळेच लागू शकतात. अंतराळात गेल्यानंतर खाद्यपदार्थ कदी कडू तर कधी चवहीन लागतात. एवढंच नव्हे तर एखादा गोड पदार्थदेखील फारच चवहीन आणि कारट लागू शकतो.

अंतर्गत अंतराळवीरांनी 2015 साली इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर Veggie एक्सपेरिमेंटअंतर्गत लाल लेट्यूस ही भाजी लावली होती. ही भाजी खाल्ल्यानंतर अनेक अंतराळवीरांनी सांगितले की या भाजीची चव ही पृथ्वीवरील लाल लेट्यूसपेक्षा वेगळी होती. अंतराळातील लाल लेट्यूस थोडे जास्त कडू होते.

संशोधकांनुसार अंतराळात झाडांच्या वाढीसाठीचे वातावरण वेगळे असते. त्यामुळेच तेथील भाज्यांची व वेगळी लागते. प्रकाश, तापमान यांचे संतुलन बिघडते. त्यामुळे स्वत:ला वाचवण्यासाठी या भाज्या वेगळे रसायन तयार करतात. त्यामुळेच अंतराळात लावलेल्या अनेक भाज्या कडू लागतात.

याच कारणामुळे अंतराळातील अन्न हे गोड असले तरी ते जास्त खारट लागते. पदार्थांची चवही बदलते. त्यामुळेच अंतराळात गेलेल्या अंतराळवीरांची भूकदेखील कमी होते. (टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)