
रेल्वेचा प्रवास हा सर्वाधिक सुरक्षित आणि सोईस्कर मानला जातो. आजही भारतातले कोट्यवधील लोक ट्रेननेच प्रवास करणे पसंद करतात. विशेष म्हणजे ट्रेनने प्रवास करण्यासाठी तिकीट कमी असते, त्यामुळेच अनेकांना ट्रेननेच प्रवास करायला आवडते.

रोज लाखो लोक ट्रेनने प्रवास करत असल्याने भारतीय रेल्वेविभागाने या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी काही नियम बनवलेले आहेत. या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते. एखाद्या नियमाचे उल्लंघन केल्यास मोठा अनर्थ घडण्याची शक्यता असते. त्यामुळेच रेल्वे विभागाचे आपले वेगळे काही नियम आहेत.

रेल्वे विभागातर्फे आगगाडी सुरक्षितपणे धावावी यासाठी अनेक संकेतांचा वापर करते. याच संकेतिक चिन्हांचा वापर करून रेल्वे प्रवासादरम्यान वेगवेगळे संदेश दिले जातात. असाच एक खास संदेश रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर लिहिलेला असतो.

रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर इंग्रजी X हे अक्षर लिहिलेले असते. हे अक्षर रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर तुम्हीही पाहिलेले असेल. आता या एक्स या अक्षराला रेल्वे विभागात फार महत्त्व आहे. हा X अक्षराचा संदेश प्रवाशांसाठी नव्हे तर रेल्व विभाग आणि रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी असतो.

रेल्वेच्या शेवटच्या डब्यामागे इंग्रजी X हे अक्षर लिहिलेले असते. हे अक्षर दिसले म्हणजे रेल्वेने आपल्यासोबत सर्व डब्बे नेलेले आहेत. मागे एकही डब्बा शिल्लक राहिलेला नाही. म्हणजेच रेल्वे आपल्या सर्वच डब्यांना घेऊन सुरक्षितपणे प्रवास करत आहे, असा त्याचा अर्थ होता.