
आपल्या भारतीय संस्कृतीत काळा धागा घालण्याची पद्धत खूप जुनी आहे. वाईट नजर, दृष्ट वाईट शक्तींपासून संरक्षण करण्यासाठी अनेक जण हा काळा धागा बांधतात. काळा रंग हा शनी आणि राहू या ग्रहांशी जोडलेला आहे. हा धागा बांधल्याने या ग्रहांच्या वाईट प्रभावांपासून आपले रक्षण होते आणि नकारात्मक ऊर्जा नियंत्रणात राहते, असे मानले जाते.

मात्र पायात काळा धागा घालणे अशुभ आणि वाईट मानले जाते. हा धागा संरक्षक असतो, पण त्याला कधीही पायात बांधू नये. त्याला पायात बांधणे योग्य नाही. काही लोक फॅशन म्हणून पायात काळा धागा बांधतात पण ते करणे टाळावे.

पायात धागा बांधल्यास नकारात्मक ऊर्जा कमी न होता उलट वाढू शकते. पायात धागा बांधल्याने शनीची स्थिती बिघडते. शनी तुमच्या पायाजवळ येतो. यामुळे शनी तुमच्या जीवनात नुकसान करू शकतो.

तुम्ही शनीला पायाजवळ बांधून ठेवत असल्यामुळे लक्ष्मीचे आगमन होण्यास अडथळा निर्माण होतो, असे मानले जाते. जर तुम्हाला या धाग्याचे शुभ परिणाम हवे असतील तर तो योग्य जागी बांधणे गरजेचे आहे.

महिलांनी डाव्या हातात काळ्या रंगाचा धागा बांधावा. तर पुरुषांनी उजव्या हातात काळ्या रंगाचा धागा बांधणे शुभ मानले जाते. ज्या लोकांचा शनि कमजोर आहे, त्यांच्यासाठी काळा धागा कंबरेला बांधणे खूप शुभ मानले जाते.

जर तुम्ही हातात काळा धागा घातला असेल, तर दुसऱ्या कोणत्याही रंगाचा धागा त्यासोबत बांधू नका. असे केल्यास काळ्या धाग्याचे शुभ परिणाम कमी होतात. तसेच तुमच्या जीवनात समस्या वाढू शकतात.

अशा प्रकारे काळा धागा आपल्याल शनि, राहू आणि केतूच्या नकारात्मक प्रभावापासून आराम मिळवून देतो. त्यामुळे, केवळ फॅशनसाठी नव्हे, तर योग्य लाभ मिळवण्यासाठी तो नेहमी नियम पाळून योग्य ठिकाणीच घालावा.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)