AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AI नावाची चेटकीण आलीये, शिक्षणसंस्था-विद्यापीठांवर प्रश्नचिन्ह, गोविंददेव गिरी महाराजांचे धाडसी विधान

AI : एआय मुळे शिक्षण सोपे झाले आहे. मात्र आता एआयमुळे शिक्षणसंस्था चालतील की नाही असा प्रश्न गोविंददेव गिरी महाराज यांनी उपस्थित केला आहे.

AI नावाची चेटकीण आलीये, शिक्षणसंस्था-विद्यापीठांवर प्रश्नचिन्ह, गोविंददेव गिरी महाराजांचे धाडसी विधान
AI EducationImage Credit source: Google
| Updated on: Mar 07, 2026 | 3:43 PM
Share

जगभरात एआयचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात एआयमुळे मोठा फायदा होताना दिसत आहे. शिक्षण क्षेत्रातही एआयमुळे मोठी क्रांती झाली आहे. एआय मुळे शिक्षण सोपे झाले आहे. कोणताही अवघड विषय असला तरी एआयच्या मदतीने तो सोप्या पद्धतीने सोडवला जाऊ शकतो. अशातच आता एआयमुळे शिक्षणसंस्था चालतील की नाही असा प्रश्न गोविंददेव गिरी महाराज यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

विवेकानंद यांच्या पुतळ्याचे अनावरण

सोलापुरातील एमआयटी कॉलेजच्या परिसरात स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला गोविंददेव गिरी महाराज उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी मोठं विधान केलं आहे. गोविंददेव गिरी महाराज म्हणाले की, विश्वनाथ कराड यांचे प्रेरणास्थान हे स्वामी विवेकानंद आहेत. देशाचा उद्धार करण्याचे लक्ष स्वामी विवेकानंद यांच्या समोर होते. अशा स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याचे आपल्या विद्यापीठात अनावरण होते हे विशेष आहे.

शिक्षण क्षेत्रात AI नावाची चेटकीण आली

पुढे बोलताना गोविंददेव गिरी महाराज यांनी म्हटले की, शिक्षा क्षेत्रासमोर मोठी आव्हाने आहेत, शिक्षणसंस्था किती चालतील हे एक मोठा प्रश्न आहे. ज्ञान निळवण्यासाठी जाण्यासाठी आता कुठल्याही विद्यापीठात जाण्याची गरज नाही. आता सगळं ज्ञान प्रत्येकाच्या मोबाईलच्या माध्यमातून मिळतंय. प्राध्यापक शिकवत असलेलं सगळं मोबाईलवर गुगलवर मिळेल. AI नावाची चेटकीण आता येऊन बसलीय, त्यामुळे शिक्षणात केवळ माहिती द्यायची असेल तर मग संस्थाची आवश्यकता नाही. त्यामुळे पुढच्या काळात विद्यापीठांना वर्क फ्रॉम होम करावं लागेल, घरून सगळं विद्यार्थी शिकतील. पुस्तकात असलेलं शिकवण म्हणजे ज्ञान नाही, भारतात माहिती म्हणजे ज्ञान नव्हे.

भारतमातेची सेवा म्हणजे जनतेची सेवा

आपल्या भाषणात गोविंददेव गिरी महाराज म्हणाले की, स्वामी विवेकानंदचे शिकागोतील भाषण म्हणजे भारताच्या पुनरुत्थानाची सुरुवात होण्याचा दिवस आहे. त्याच्या आधी भारतात रानटी लोकं राहतात असा समज होता, पण स्वामी विवेकानंदच्या भाषणामुळे जगाचे डोळे खाडकन उघडले. ज्ञानचा खजिना उघडणारा पहिला महापुरुष म्हणजे स्वामी विवेकानंद आहेत. आपल्या धर्मांना स्वामीजींनी सेवा शिकवली, भारतमातेची सेवा म्हणजे इथल्या जनतेची सेवा होय. गरीब मुलं शाळेत येऊ शकतं नसतील तर शाळा त्यांच्यापर्यंत न्या हा मंत्र स्वामी विवेकानंद यांनी दिली.

पसायदान सांगणारा भारत जगातील एकमेव देश

गोविंददेव गिरी महाराज म्हणाले की, जमशेद टाटा यांना कारखाना काढण्याची प्रेरणा स्वामी विवेकानंद यांनी दिली. भारताला गुलाम करायचं असेल तर इथली शिक्षण पद्धती नष्ट केली पाहिजे असं मेकोले म्हणत होता, आमच्या देशाला गुलाम करण्यासाठी इंग्रजी शिक्षणाचा आरंभ झाला, भूतकाळाबद्दल न्यूनगंड वाटावा अशी व्यवस्था करण्यात आली. 1836 मध्ये इंग्रजी शिक्षणाचा आरंभ झाला पण 2036 मध्ये गुलामगिरीच्या सगळ्या खुणा पुसण्याचा आरंभ आपण केलं पाहिजे. जगभरात व्यापारी देश आहेत, एकीकडे शांतीच्या बाता करायची आणि दुसरीकडे शस्त्र बनवून दुसऱ्या देशांना युद्धात मग्न करणारे देश या जगात आहेत. पण पसायदान सांगणारे जगभरात केवळ एक राष्ट्र आहे ते म्हणजे भारत.

Follow Us
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार