World Highest Railway Bridge: जगातील सर्वात उंच रेल्वे पूल बनवण्यासाठी लागले 20 वर्ष, 1400 कोटींचा खर्च, या पुलामुळे पाकिस्तानची चिंता वाढली

World Highest Railway Bridge: जम्मू-श्रीनगरला रेल्वेने जोडण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. या मार्गावर असलेल्या जगातील सर्वात उंच पुलावर रेल्वेची चाचणी सुरु झाली. उधमपूर-श्रीनगर-बारामूला रेल्वे लिंक ( USBRL ) जोडणाऱ्या या रेल्वे पुलावरुन लवकरच वाहतूक सुरु होणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी चिनाब रेल्वे पुलावरील रेल्वे चाचणीचा व्हिडिओ शेअर केला आहे.

| Updated on: Jun 17, 2024 | 11:10 AM
1 / 5
उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्प या वर्ष अखेरीस पूर्ण होणार आहे. जम्मूमधील रामबनमधील संगलदान आणि रियासी दरम्यान पहिल्या रेल्वेची यशस्वी चाचणी झाली. ही रेल्वे चिनाब पुलावरुन जाणार आहे. हा पूल जगातील सर्वात उंच पूल आहे.

उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्प या वर्ष अखेरीस पूर्ण होणार आहे. जम्मूमधील रामबनमधील संगलदान आणि रियासी दरम्यान पहिल्या रेल्वेची यशस्वी चाचणी झाली. ही रेल्वे चिनाब पुलावरुन जाणार आहे. हा पूल जगातील सर्वात उंच पूल आहे.

2 / 5
46 किमी लांब संगलदान-रियासी मार्गाचे आता 27 आणि 28 जून रोजी रेल्वेचे सुरक्षा आयुक्त डीसी देशवाल तपासणी करणार आहे. या तपासणीपूर्वी उर्वरित कामे पूर्ण केली जाणार आहे, असे रेल्वेतर्फे सांगण्यात आले.

46 किमी लांब संगलदान-रियासी मार्गाचे आता 27 आणि 28 जून रोजी रेल्वेचे सुरक्षा आयुक्त डीसी देशवाल तपासणी करणार आहे. या तपासणीपूर्वी उर्वरित कामे पूर्ण केली जाणार आहे, असे रेल्वेतर्फे सांगण्यात आले.

3 / 5
चिनाब ब्रिज पॅरिसमधील एफिल टॉवरपेक्षा उंच आहे. एफिल टॉवरची उंची 330 मीटर तर चिनाब पुलाची उंची 359 मीटर आहे. आता संगलदान मार्गावरुन इलेक्ट्रिक रेल्वे इंजिनाची यशस्वी चाचणी घेतल्यानंतर या मार्गावरुन पहिली रेल्वे 30 जून रोजी धावणार आहे.

चिनाब ब्रिज पॅरिसमधील एफिल टॉवरपेक्षा उंच आहे. एफिल टॉवरची उंची 330 मीटर तर चिनाब पुलाची उंची 359 मीटर आहे. आता संगलदान मार्गावरुन इलेक्ट्रिक रेल्वे इंजिनाची यशस्वी चाचणी घेतल्यानंतर या मार्गावरुन पहिली रेल्वे 30 जून रोजी धावणार आहे.

4 / 5
USBRL प्रोजेक्ट 1997 मध्ये सुरु केला होता. 272 किमी मार्गावर रेल्वे लाईन उभारण्यात आली. आतापर्यंत 209 किमी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत रियासीला कटराला जोडणारी 17 किमी रेल्वेमार्गाचे काम पूर्ण होईल. ज्यामुळे कश्मीर देशातील इतर भागाशी जोडला जाणार आहे.

USBRL प्रोजेक्ट 1997 मध्ये सुरु केला होता. 272 किमी मार्गावर रेल्वे लाईन उभारण्यात आली. आतापर्यंत 209 किमी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत रियासीला कटराला जोडणारी 17 किमी रेल्वेमार्गाचे काम पूर्ण होईल. ज्यामुळे कश्मीर देशातील इतर भागाशी जोडला जाणार आहे.

5 / 5
चिनाब पुलामुळे पाकिस्तानची चिंता वाढली आहे. हा पूल अखनूर भागात तयार झाला आहे. अखनूर भाग हा काश्मीरचा चिकन नेक आहे. यामुळे या ठिकाणी पूल होणे भारतासाठी खूप महत्वाचे होते. या पुलामुळे आता कोणत्याही ऋतूत भारतीय सेना रेल्वेने या भागात जाऊ शकते. यामुळे पाकिस्तानसाठी हा चिंतेचा विषय आहे.

चिनाब पुलामुळे पाकिस्तानची चिंता वाढली आहे. हा पूल अखनूर भागात तयार झाला आहे. अखनूर भाग हा काश्मीरचा चिकन नेक आहे. यामुळे या ठिकाणी पूल होणे भारतासाठी खूप महत्वाचे होते. या पुलामुळे आता कोणत्याही ऋतूत भारतीय सेना रेल्वेने या भागात जाऊ शकते. यामुळे पाकिस्तानसाठी हा चिंतेचा विषय आहे.

Follow Us