Eknath Shinde : ठाकरे सरकारसाठी पुढचे 24 तास वैऱ्याचे, शरद पवार दिल्ली सोडून मुंबईकडे, रात्री बैठकांचा सपाटा?

| Updated on: Jun 21, 2022 | 7:15 PM

सुरतच्या हॉटेलमध्ये असलेले शिवसेना आमदार रमेश बोरनारे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये आता शिंदे साहेब घेतील तो आमचा निर्णय, असे बोरनारे आपल्या एका कार्यकर्त्याला सांगत आहेत. दिवसभरात राज्यात सुरु असलेल्या अशा राजकीय घडमोडींनी उद्धव ठाकरेंची चिंता वाढवली आहे. पुढच्या 24 तास शिवसेनेसाठी फार महत्वाचे असून, यावेळी काय राजकीय घमासान होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Eknath Shinde : ठाकरे सरकारसाठी पुढचे 24 तास वैऱ्याचे, शरद पवार दिल्ली सोडून मुंबईकडे, रात्री बैठकांचा सपाटा?
ठाकरे सरकारसाठी पुढचे 24 तास वैऱ्याचे, शरद पवार दिल्ली सोडून मुंबईकडे
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरेंची पुरती झोप उडाली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला मोठे धक्के सहन करावे लागू शकतात. एकनाथ शिंदेनी 30 ते 35 आमदारांच्या पाठिंब्यासह हे बंड (Revolt) पुकारले आहे. तसेच बंड मागे घेण्यासाठी शिंदे यांनी काही प्रस्ताव शिवसेनेसमोर ठेवले आहेत. राज्यातील राजकीय उलथापालथ पाहता शिवसेनेसाठी पुढील 24 तास ठाकरे सरकार (Thackeray Government)साठी वैऱ्याचे आहेत. त्यामुळे रात्री बैठकांवर बैठका होण्याची शक्यता असून या बैठकांमध्ये काय तोडगा निघतो याकडे राज्याचे लक्ष लागून आहे. एकनाथ शिंदे यांच्या प्रस्तावाबाबत शिवसेना काय निर्णय घेतेय? आणि शिंदे यांचे बंड थोपवण्यास यशस्वी होते का हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही दिल्लीहून मुंबईला रवाना झाले आहेत.

दरम्यान, सुरतच्या हॉटेलमध्ये असलेले शिवसेना आमदार रमेश बोरनारे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये आता शिंदे साहेब घेतील तो आमचा निर्णय, असे बोरनारे आपल्या एका कार्यकर्त्याला सांगत आहेत. दिवसभरात राज्यात सुरु असलेल्या अशा राजकीय घडमोडींनी उद्धव ठाकरेंची चिंता वाढवली आहे. पुढच्या 24 तास शिवसेनेसाठी फार महत्वाचे असून, यावेळी काय राजकीय घमासान होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबईत रात्री बैठकीचे आयोजन

महाराष्ट्र राज्य सरकारला कुठलाही धोका नाही. आज रात्री साडे आठ वाजता मुंबईत बैठक होणार आहे. शरद पवार बैठकीत जातील, त्यानंतर जे काही असेल ते स्पष्ट होईल, असे काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा