मला जर कळलं जाणीवपूर्वक आमच्या लोकांना त्रास दिला तर…, अजित पवारांचा रोख कोणाकडे?

| Updated on: Oct 03, 2022 | 9:34 AM

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. . दमदाटी करणाऱ्यांची सत्ता लवकरच जाणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

मला जर कळलं जाणीवपूर्वक आमच्या लोकांना त्रास दिला तर..., अजित पवारांचा रोख कोणाकडे?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : विरोधी पक्षनेते (Opposition Leader) अजित पवार (Ajit Pawar) यांनी सरकारी अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे. अधिकाऱ्यांनो (officer) कुणाच्याही दबावाला बळी पडू नका असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. दबावाला बळी पडून चुकीची कामं करू नका. दमदाटी करणाऱ्यांचे सरकार जाणार आहे. आम्ही सत्तेत कधी येऊ हे कळणार देखील नाही. त्यावेळी जर मला कळाले एखाद्या अधिकाऱ्याने चुकीचे काम केले, किंवा आमच्या माणसांना जाणीवपूर्वक त्रास दिला तर खैर नाही, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे. दरम्यान आमच्या माणसांकडून जर काही चुकीची कामं झाले असतील तर  त्यांच्याविरोधात जरूर कारवाई करा, माझं काहीही म्हणण नाही असंही यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हटलं अजित पवारांनी?

अजित पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे. दिवस बदलत असतात. आम्ही सत्तेत कधी येऊ हे कळणार देखील नाही. त्यामुळे मी अधिकाऱ्यांना सांगतो त्यांनी कोणाच्याही दबावाला बळी पडू नये. बळी पडून अनेकदा चुकीचे कामं होतात. तसं करू नका,  तेव्हा जर मला कळलं की एखाद्याने जाणीवपूर्वक आमच्या माणसांना त्रास दिला तर खैर नाही. आमच्या लोकांचे काही चुकले तर जरूर कारवाई करा, माझं काहीही म्हणन नसेल असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

राज्य सरकारवर निशाणा

अजित पवार यांनी यावेळी राज्य सरकारवर देखील जोरदार निशाणा साधला आहे. दमदाटी करणाऱ्यांची सत्ता लवकरच जाणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी कोणाच्या दबावाला बळी पडू नये असं आवाहनही यावेळी अजित पवार यांनी केलं आहे.