काँग्रेस प्रवेशाआधी शिवसेना आमदार दर्ग्यात

| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

चंद्रपूर : शिवसेनेचे वरोऱ्याचे आमदार बाळू धानोरकर हे काँग्रेसमधील प्रवेशाआधी ‘अजमेर शरीफ दर्ग्या’त दर्शनासाठी गेले. काँग्रेस प्रवेशानंतर चंद्रपूर येथून तिकिट मिळावे यासाठी धानोरकरांनी अजमेर शरीफ दर्गा गाठला. त्यांनी दर्ग्यात चादर चढवली आणि आपल्या इच्छेच्या पूर्ततेसाठी प्रार्थनाही केली. येत्या दोन दिवसांत धानोरकर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. वरोरा विधानसभा मतदार संघातील शिवसेना आमदार बाळू धानोरकर हे […]

काँग्रेस प्रवेशाआधी शिवसेना आमदार दर्ग्यात
Follow us on

चंद्रपूर : शिवसेनेचे वरोऱ्याचे आमदार बाळू धानोरकर हे काँग्रेसमधील प्रवेशाआधी ‘अजमेर शरीफ दर्ग्या’त दर्शनासाठी गेले. काँग्रेस प्रवेशानंतर चंद्रपूर येथून तिकिट मिळावे यासाठी धानोरकरांनी अजमेर शरीफ दर्गा गाठला. त्यांनी दर्ग्यात चादर चढवली आणि आपल्या इच्छेच्या पूर्ततेसाठी प्रार्थनाही केली. येत्या दोन दिवसांत धानोरकर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

वरोरा विधानसभा मतदार संघातील शिवसेना आमदार बाळू धानोरकर हे भाजपशी पुन्हा युती झाल्याने नाराज आहेत. शिवाय, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून ते लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे अर्थात युती झाल्याने बाळू धानोरकर यांना शिवसेनेकडून चंद्रपुरातून लोकसभा लढवता येणार नाही. त्यामुळे बाळू धानोरकरांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

कोण आहेत बाळू धानोरकर?

बाळू धानोरकर हे शिवसेनेचे चंद्रपुरातील वरोरा विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. सुरेश नारायण धानोरकर असे त्यांचे पूर्ण नाव असून, बाळूभाऊ धानोरकर या नावाने ते मतदारसंघात आणि चंद्रपूर जिल्ह्यात परिचित आहेत. 2009 सालीही बाळू धानोरकर वरोऱ्यातून आमदारकीला उभे होते. मात्र, त्यावेळी काँग्रेसच्या संजय देवतळेंनी त्यांचा परभाव केला होता. मात्र, 2014 च्या निवडणुकीत बाळू धानोरकर विजयी होत विधानसभेत गेले.

निवडणुकीच्या तारखा जाहीर

केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.

महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.

संबंधित बातम्या :

लोकसभा निवडणूक 2019 : प्रचार, मतदान ते निकाल, A टू Z माहिती

तुमच्या मतदारसंघात कधी मतदान? पाहा इथे

तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही? इथे चेक करा