AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘…आणि मग Penguin Gang ची पार्टी सुरू’ वीज बिलावरून नितेश राणेंची जहरी टीका

भाजप आमदार  नितेश राणे (bjp mla Nitesh Rane) यांनीही ट्वीट करत आघाडी सरकार आणि नाईटलाईवरून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे.

'...आणि मग Penguin Gang ची पार्टी सुरू' वीज बिलावरून नितेश राणेंची जहरी टीका
Nitesh Rane
| Edited By: | Updated on: Nov 19, 2020 | 1:40 PM
Share

मुंबई : लॉकडाऊन काळातील वीज बिलात (Electricity bill) कुठलीही सवलत मिळणार नसल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Energy Minister Nitin Raut) यांनी जाहीर केल्यानंतर राजकीय वातावरण पेटून उठलं आहे. विरोधकांकडून महाविकास आघाडी सरकावर (Mahavikas Agadhi on the government) जोरदार टीका होत आहे. अशात भाजप आमदार  नितेश राणे (bjp mla Nitesh Rane) यांनीही ट्वीट करत आघाडी सरकार आणि नाईटलाईवरून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. (bjp mla nitesh rane criticizing tweet against Thackeray government)

‘महाविकास आघाडी सरकारने नाईटलाईफ जास्तच मनावर घेतली आहे. यामुळे इतकं वीज बिल लोकांना आलं की कोणीच भरणार नाही. मग काय अंधारच अंधार होणार’ अशा शब्दात भाजप आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. यासंबंधी त्यांनी ट्वीट करत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे.

सगळीकडे अंधारच अंधार झाला की Penguin Gang ची पार्टी सुरू असं म्हणत नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना चिमटा काढलाय. यावरून राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. तर नितेश राणेंच्या या ट्वीटला आघाडी सरकार कसं उत्तर देणार याकडेच आता सगळ्यांचं लक्ष आहे.

नितेश राणेंनी ट्वीटमध्ये नेमकं काय म्हटलं? नितेश राणे हे नेहमी ट्वीट करत आघाडी सरकारवर घणाघाती टीका करत असतात. यावेळीही त्यांनी वाढीव वीज बिलावरून ठाकरे सरकार आणि आदित्य ठाकरे यांनी चिमटे काढले आहेत. ते ट्वीटमध्ये म्हणाले की, ‘या महाविकास आघाडी सरकारने “NIGHTLIFE” जास्तच मनावर घेतले आहे अस दिसते..विज बिल इतके हातात दिले की, कोणच भरणार नाही.. मग काय अंधारच अंधार..आणि मग.. Penguin Gang ची पार्टी सुरु!!!’ (bjp mla nitesh rane criticizing tweet against Thackeray government)

इतर बातम्या –

वीज बिल भरु नका, प्रकाश आंबेडकर यांचे जनतेला आवाहन

सरकारमध्ये दम असेल तर वीज बिलाची वसुली करुन दाखवावीच; राजू शेट्टींचे आव्हान

(bjp mla nitesh rane criticizing tweet against Thackeray government)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.