AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

48 तासांचं अल्टिमेटम, शरद पवार सीमाभागात जाणार होते, त्याचं काय झालं? भाजप नेत्याने डिवचलं

48 तासांच्या अल्टिमेटमचं काय झालं, असा खोचक सवाल शरद पवार यांना विचारण्यात आलाय.

48 तासांचं अल्टिमेटम, शरद पवार सीमाभागात जाणार होते, त्याचं काय झालं? भाजप नेत्याने डिवचलं
Image Credit source: social media
| Edited By: | Updated on: Dec 09, 2022 | 12:08 PM
Share

मुंबईः 48 तासाचं अल्टिमेटम देतोय. कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्यायावर मार्ग काढला नाही तर मी स्वतः बेळगावात जाईन, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला होता. केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकारला दोन दिवसांपूर्वी शऱद पवार (Sharad Pawar) यांनी हा इशारा दिला होता, त्याचं काय झालं, असा सवाल करत भाजप नेत्याने डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक प्रश्न चिघळला असून केंद्र सरकार किंवा महाराष्ट्रातील भाजप यावर काय भूमिका घेते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्यातच भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शरद पवार यांना असा प्रश्न विचारलाय.

निलेश राणे यांनी आज एका ट्विटद्वारे शरद पवारांना हा प्रश्न विचारलाय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागंलय.

बेळगाव येथील सीमावासिय प्रचंड दहशतीत आहेत. महाराष्ट्र सरकारकडून त्यांना सहकार्याची अपेक्षा आहे. त्यातच कर्नाटकचे मुख्यमंत्री वारंवार चिथावणीखोर वक्तव्ये करत आहेत.

त्यामुळे केंद्र सरकारने यात लवकरात लवकर हस्तक्षेप करावा. महाराष्ट्र सरकारने काही केलं नाही तर परिस्थिती आणखी चिघळेल. यासाठी केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकार जबाबदार असेल, असा इशारा शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत दिला होता.

तोच धागा पकडत निलेश राणे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. 48 तासांच्या अल्टिमेटमचं काय झालं, असा सवाल यांनी केला आहे.

6 डिसेंबर रोजी मंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील हे बेळगावात जाणार होते. मात्र कर्नाटक सरकारच्या इशाऱ्यानंतर त्यांचा हा दौराही रद्द झाला.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार होते. मात्र या बैठकीतही सीमाप्रश्नावर बोलणं झालं नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ.