Dharmendra Pradhan Resigns: कहते थे इस सरकार में इस्तीफे नही होते… धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच जंतरमंतरवर फटाके फुटले; प्रचंड जल्लोष

Dharmendra Pradhan Resigns: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जंतर मंतर येथे प्रचंड जल्लोष पाहायला मिळत आहे. आता कॉकरोच जनता पार्टीचे संस्थाप अभिजीत दीपके यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Dharmendra Pradhan Resigns: कहते थे इस सरकार में इस्तीफे नही होते... धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच जंतरमंतरवर फटाके फुटले; प्रचंड जल्लोष
Abhijit Dipke
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jul 25, 2026 | 3:07 PM

नीट पेपर फुटी प्रकरणी कॉकरोच जनता पार्टीचे दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन सुरु होते. या आंदोलनात लाखो विद्यार्थी सहभागी झाले. या तरुणांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आता त्यांनी राजीनामा दिल्याचे समोर आले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर कॉकरोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जंतर मंतर येथे बोलताना ते म्हणाले की, आपण सर्वांनी हे करुन दाखवलं. हे लोक काय म्हणायचे की इस सरकार में इस्तिफे नही होते. क्या कहते थे इस सरकार में इस्तिफे नही होते.

अभिजीत दीपके काय म्हणाले?

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जंतर मंतर येथे जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. अभिजीत दीपके यांनी विद्यार्थांशी संवाद साधताना, ज्या विद्यार्थींनी आत्महत्या केल्या त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाना एक कोटीची आर्थिक मदत करा. गुंडगिरी करणाऱ्या पोलिसांनी जो लाढीचार्ज केला होता, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. डीसीपी संदीप लांबा, एसीपी अजय शर्मा, सचिन शर्मा यांनी अमित शाहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांगण्यावरून तरुणांवर लाठीचार्ज केला. त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे.

अभिजीत दीपके यांची मागणी काय?

अभिजीत दीपके यांनी पुढे बोलताना मागणी केली की, 20 जुलैनंतर ज्या-ज्या विद्यार्थ्यांवर कारवाई झाली, गुन्हे दाखल झाले ते सर्व मागे घेतले पाहिजेत.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याआधी काय काय घडलं?

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला देशभरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून पाठिंबा वाढत चालला होता. कला, शिक्षण, मनोरंज क्षेत्रातूनही तरुणांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला जात होता. हे आंदोलन संपवण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांनी सोनम वांगचूक यांची भेट घेतली होती. तसेच सीजेपीच्या प्रतिनिधींचीही त्यांनी भेट घेतली होती. अगोदर आम्ही कोणत्याही आंदोलक विद्यार्थ्यावर कारवाई करणार नाही, सर्व गुन्हे मागे घेऊ असे केंद्र सरकारने सांगितले होते. तसेच नीट पेपरफुटीचा खटला हा जलदगती न्यायालयात चालवला जाईल, असेही खुद्द पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केले होते. या आश्वासनानंतर सोनम वांगचूक यांनी आपले उपोषण सोडले होते. परंतु दुसरीकडे जंतर मंतरवर आंदोलन करत असलेल्या सीजेपीने मात्र आंदोलन कायम राहील. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका घेतली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us