Saamana : ‘महाराष्ट्राचे तुकडे करणाऱ्यांचे तुकडे करु’ म्हटल्यावर ‘जीवितास धोका आहे होss’ म्हणून बोभाटा

| Updated on: Jun 28, 2022 | 7:22 AM

Shiv sena on BJP : पुढील दोन दिवसांत त्यांचं सरकार येईल, बंडखोरांचे नाही. त्यासाठी ते उतावीळ आहेत.

Saamana : महाराष्ट्राचे तुकडे करणाऱ्यांचे तुकडे करु म्हटल्यावर जीवितास धोका आहे होss म्हणून बोभाटा
भाजपवर थेट हल्लाबोल!
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून (Saamana Editorial) बंडखोर आमदारांच्या कृत्यांवर टीका करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे तुकडे करणाऱ्यांचे तुकडे करु, असं शिवसेनेपैकी (Shiv sena Rebel) कुणी बोललं तर यांच्यापासून आमच्या जीवितास धोका आहे होss, असं म्हणून बोभाटा करायचा, अशा शब्दांत सुनावण्यात आलं आहे. सोमवारी सुप्रीम कोर्टात (Supreme Court on Maharashtra Political Crisis) पार पडलेल्या सुनावणीवेळी शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांना आमदारांच्या जीविताला धोका असल्याचा युक्तिवाद केला होता. त्यानंतर आता शिवसेनेच्या मुखपत्रातून याला उत्तर देण्यात आलंय. यावेळी भाजपचे रावसाहेब दानवे यांनाही टोला लगवाण्यात आला. एका बाजूला चंद्रकांत पाटील म्हणतात शिवसेनेत जे सुरु आहे, त्याच्याशी आपला संबंध नाही, तर दुसरीकडे रावसाहेब दानवे यांना दोन दिवसात सरकार पडेल, अशी शक्यता वर्तवली होती. त्यावरुनही सामनातून टोला लगावण्यात आला आहे.

नेमकं काय म्हटलंय?

भाजपची अलिकडच्या काळातली वक्तव्य गोंधळात टाकणारी आहेत. एकीकडे चंद्रकांत पाटलांनी सांगयचं, शिवसेनेत जे सुरु आहे, त्याच्याशी आपला संबंध नाही. त्याचवेळी रावसाहेब दानेवांनी अंगाला हळद दावून आणि मुंडावळ्या बांधून बोलायचे, ‘आता फार तर एक -दोन दिवसच विरोधी पक्षात बसू. दोन-तीन दिवसांत राज्यात भाजपचं सरकार येईल’ शिवसेनेच्या बंडाशी संबंध नाही असं म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला दोन दिवसांत भाजपचं सरकार येईल, असं बोलायचं, त्यामुळे खरं काय? असा सवाल सामना अग्रलेखातून उपस्थित करण्यात आलाय.

हे सुद्धा वाचा

भाजपवर हल्लाबोल!

भाजपशी जे पाट लावू इच्छित आहेत, त्यांनी आपला महाराष्ट्र बाणा एकदा तपासून पाहावाच, असंही सामनातून म्हटलंय. दानवे म्हणतात, त्याप्रमाणे राज्यात पुढील दोन दिवसांत त्यांचं सरकार येईल, बंडखोरांचे नाही. त्यासाठी ते उतावीळ आहेत. पण महाराष्ट्र हे पाप स्वीकारील काय? असा सवालही सामना अग्रलेखातून उपस्थित करण्यात आलाय.

बात स्वाभिमानाची आणि हिंदुत्त्वाची करायची आणि भलतेच उद्योग करुन महाराष्ट्रद्रोह्यांचे हात बळकट करायचे, असं म्हणत शिवसेनेने भाजपसह बंडखोर आमदारांनाही सुनावलंय.