राजकारणात रेडीमेड कपड्यांऐवजी शिवून घेणारे महत्त्वाचे, जयंत पाटलांचा भाजपला टोला

भाजपने छोट्या कार्यकर्त्यांना मोठं करावं. राजकारणात रेडीमेड कपड्यांऐवजी शिवून घेणारे लोक महत्त्वाचे असतात, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला लगावला.

राजकारणात रेडीमेड कपड्यांऐवजी शिवून घेणारे महत्त्वाचे, जयंत पाटलांचा भाजपला टोला
Follow us
| Updated on: Aug 18, 2019 | 1:59 PM

मुंबई : भाजपचं काँग्रेसीकरण सुरु आहे. फक्त आम्ही मोठे केलेलं लोक भाजप घेत आहे, पण त्यांच्या कार्यकर्त्यांचं काय? त्यांनी छोट्या कार्यकर्त्यांना मोठं करावं, असा सल्ला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाजपला दिला आहे. राजकारणात रेडीमेड कपड्यांऐवजी शिवून घेणारे लोक महत्त्वाचे असतात, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

भाजपपासून सर्व मतदार दूर जात आहेत. ज्यांना नाकारलं, त्यांनाच जवळ घेतल्याने जनतेच्या मनातली विश्वासार्हता भाजपने गमावली आहे. भाजपने सुरु केलेला हा नवा उद्योग भारतीय राजकारणाला वेगळी दिशा देणारा आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

भाजपची लोकप्रियता संपली की हे लोक आमच्याकडे येतील. उद्या एखाद्या तिसऱ्या पक्षाकडे जातील. मात्र आयाराम-गयारामांचं महत्त्व वाढवल्याने भाजपवरील विश्वास कमी होत आहे, असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं.

महिला आघाडीचं कोणी गेलं असलं तरी त्याचा किंचितही परिणाम आमच्या पक्षावर झाला नाही, असा दावा जयंत पाटील यांनी केला. त्यांचा रोख अर्थात चित्रा वाघ यांच्याकडे होता. आमचे कार्यकर्ते कुठेही जाणार नाहीत, असा विश्वासही जयंत पाटलांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा दोन्ही पक्षांनी 288 जागांवर उमेदवारी अर्ज मागवले आहेत. 288 जागांवर चाचपणी करत आहोत. एकत्र बसून अंतिम चर्चा झाली, की आघाडी झाली, असं म्हणता येईल. अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. पुराचं संकट ओसरल्यावर येत्या आठवड्यात चर्चा करु, असं जयंत पाटील म्हणाले.

विरोधी पक्षातील निम्मे आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी त्याआधी ‘टीव्ही9’शी बोलताना केला होता.

मेगाभरतीचं दुसरं पर्व लवकरच, विरोधी पक्षातील निम्मे आमदार भाजपच्या संपर्कात, प्रसाद लाड यांचा दावा

संपर्कात तर संपूर्ण महाराष्ट्र आहे, मात्र पक्षात कोणाला घ्यायचं, आणि कोणाला नाही, याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री घेणार आहेत. पक्षात काहीच राहिलं नसेल तर प्रत्येक जण वाट शोधतो, अशीच काहीशी परिस्थिती राष्ट्रवादीची झालेली आहे. त्यामुळे पक्षातील अनेक जण शिवसेना-भाजपच्या संपर्कात आहेत, असं प्रसाद लाड म्हणाले.

शरद पवारांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य मधुकर पिचड, त्यांचे सुपुत्र वैभव पिचड (Vaibhav Pichad), साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhonsle), मुंबईच्या वडाळा येथील काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर (Kalidas Kolambkar), नवी मुंबईचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक (Sandeep Naik) आणि राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी आतापर्यंत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.