AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

झारखंड विधानसभा अंतिम निकाल, भाजप आऊट, मुख्यमंत्रीही पडले, हेमंत सोरेन नवे मुख्यमंत्री!

झारखंड विधानसभा निवडणूक 2019 चे निकाल (Jharkhand election result) जाहीर झाले आहेत. झारखंडमध्ये शिबू सोरेन यांचे सुपुत्र हेमंत सोरेन यांनी सत्ताधारी भाजपला धोबीपछाड दिली.

झारखंड विधानसभा अंतिम निकाल, भाजप आऊट, मुख्यमंत्रीही पडले, हेमंत सोरेन नवे मुख्यमंत्री!
| Updated on: Dec 24, 2019 | 11:15 AM
Share

रांची : झारखंड विधानसभा निवडणूक 2019 चे निकाल (Jharkhand election result) जाहीर झाले आहेत. झारखंडमध्ये शिबू सोरेन यांचे सुपुत्र हेमंत सोरेन यांनी सत्ताधारी भाजपला धोबीपछाड दिली. हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम), काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) यांच्या आघाडीला पूर्ण बहुमत मिळालं. काँग्रेस आघाडीने 81 पैकी 47 जागा मिळवत, विजय खेचून आणला. सत्ताधारी भाजपला केवळ 25 जागांवर समाधान मानावं लागलं. (Jharkhand election result) झारखंडमध्ये 41 हा बहुमताचा आकडा आहे.

या विजयानंतर आता झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांच्या नेतृत्त्वात काँग्रेस आघाडी सरकार स्थापन करणार आहे. महाआघाडीचे नेते हेमंत सोरेन येत्या 27 डिसेंबरला झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. रांचीतील मोराबादी मैदानात हेमंत सोरेन यांच्यासह जेएमएमचे 6, काँग्रेसचे 5 आणि आरजेडीचा 1 आमदार मंत्रिपदाची शपथ घेईल. म्हणजे हेमंत सोरेन यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याशिवाय 12 सहकारी असतील.

महत्त्वाचं म्हणजे भाजप नेते रघुवर दास यांचं सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न धुळीला मिळालं. रघुवर दास यांचाही या निवडणुकीत पराभव झाला.  जमशेदपूर पूर्व या जागेवरुन रघुवर दास निवडणुकीच्या रिंगणात होते. या मतदारसंघाचा निकाल सर्वात शेवटी जाहीर झाला. भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार रघुवार दास यांचा 15833 मतांनी पराभव झाला.

भाजप 37 वरुन 25 वर घसरली

झारखंड विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला मोठा झटका बसला. सत्ता तर गेलीच पण भाजप 37 जागांवरुन 25 जागांवर घसरली. 2014 मध्ये भाजपने 72 जागा लढवत 37 जागांवर विजय मिळवला होता.

झारखंड विधानसभा निकाल

या निवडणुकीत एकट्या झारखंड मुक्ती मोर्चाला 30 जागांवर विजय मिळाला. हाच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.  भाजप 25 जागांसह दुसऱ्या, तर काँग्रेस 16 जागांसह तिसऱ्या जागी राहिली.

70 हजार मतांनी जिंकणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा पराभव

भाजपला या निवडणुकीत मोठा धक्का बसला. झारखंडचे मावळते मुख्यमंत्री रघुवर दास हे 2014 मध्ये 70 हजार 157 मतांनी विजयी झाले होते. मात्र 2019 च्या निवडणुकीत त्यांचा 15 हजार मतांनी पराभव झाला. याशिवाय रघुवर दास यांच्या मंत्रिमंडळातील 5 मंत्र्यांचाही पराभव झाला.

रघुवर दास हे जमशेदपूर पूर्व या मतदारसंघातून तब्बल 5 वेळा विजयी झाले होते. मात्र यंदा भाजपचे बंडखोर नेते सरयू राय यांनी त्यांचा पराभव केला.

हेमंत सोरेन यांचा दोन्ही मतदारसंघात विजय

झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत असलेले हेमंत सोरेन हे दुमका आणि बरहेट या दोन्ही मतदारसंघातून विजयी झाले. दुमका मतदारसंघात त्यांनी भाजपच्या डॉक्टर लुईस यांचा 13,188 मतांनी पराभव केला. लईस या रघुवर सरकारमध्ये मंत्री होत्या. तर बरहेट मतदारसंघात हेमंत सोरेन यांनी 25 हजार 740 मतांनी विजय मिळवला.

झारखंड विधानसभा निवडणूक निकाल – 2019

पक्ष विजयी
एजेएसयू पार्टी

 

2
भाजप

 

25
सीपीआय-M

 

01
अपक्ष

 

02
काँग्रेस

 

16
झारखंड मुक्ती मोर्चा 30
झारखंड विकास मोर्चा (प्रजातांत्रिक) 03
राष्ट्रवादी काँग्रेस 01
राष्ट्रीय जनता दल (राजद) 01
एकूण 81

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.