अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या एका शेतकऱ्याची तब्येत बिघडली! राज्य सरकारचं दुर्लक्ष, भाजपचा आरोप

| Updated on: Oct 12, 2021 | 12:21 PM

लातूरमध्ये 72 शेतकऱ्यांनी 72 तास अन्नत्याग आंदोलन सोमवारपासून सुरु केलंय. अशात एका शेतकऱ्याची तब्येत बिघडल्यानं त्याला रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.

अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या एका शेतकऱ्याची तब्येत बिघडली! राज्य सरकारचं दुर्लक्ष, भाजपचा आरोप
लातूरमध्ये शेतकऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन
Follow us on

मुंबई : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे. मात्र, राज्य सरकारकडून केवळ जुलै महिन्यातील अतिवृष्टीसाठी मदत जाहीर करण्यात आलीय. मात्र, सप्टेंबरमध्ये झालेल्या नुकसानाबाबत अद्याप मदत जाहीर झालेली नाही. या पार्श्वभूमीवर लातूरमध्ये 72 शेतकऱ्यांनी 72 तास अन्नत्याग आंदोलन सोमवारपासून सुरु केलंय. अशात एका शेतकऱ्याची तब्येत बिघडल्यानं त्याला रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. (72-hour hunger strike by farmers in Latur, one farmer’s health deteriorated)

केशव उपाध्येंची ठाकरे सरकारवर टीका

‘अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीकडे लक्ष वेधण्यासाठी लातूर येथे 72 तास अन्नत्याग आंदोलन सुरू केलेल्या शेतकऱ्यांपैकी 2 शेतकऱ्यांची तब्येत बिघडली असून त्याला ॲडमिट केले आहे. लखीमपूरवरून इथे बंद करणाऱ्या ठाकरे सरकारला मात्र अद्याप या शेतकऱ्यांची दखल घ्यावी वाटत नाही’, अशी टीका भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटरद्वारे केलीय.

संभाजी पाटील-निलंगेकर, रमेश कराडांचा सहभाग

दरम्यान, लातूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोमवारपासून शेतकऱ्यांनी 72 तासाचं अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. भाजपचे आमदार संभाजी पाटील-निलंगेकर आणि आमदार रमेश कराड हे देखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

लातूरमध्ये भाजपचे 72 तास अन्नत्याग आंदोलन

मागील काही दिवसांपूर्वी नाशिक, उत्तर महाराष्ट्र तसेच संपूर्ण मराठवाड्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं. मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यातील पिके पाण्याखाली गेली. नदी, नाले तसेच ओढ्यांना पूर आल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातून पूर्ण खरीप हंगाम गेलेला आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता सरकारने शेतकऱ्यांची मदत करावी, अशी मागणी भाजप म्हणजेच विरोधी पक्षाकडून केली जात आहे. लातूरमध्ये भाजप नेते संभाजी पटील निलंगेकर याच मागणीला घेऊन आक्रमक झाले आहेत. त्यांनी 72 तासांचे अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात खुद्द संभाजी पाटील निलंगेकर तसेच आमदार रमेश कराड सहभागी झाले आहेत. तसेच या नेत्यांसोबत शेतकरी देखील उपस्थित आहेत.

शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी

भाजपने लातूरमध्ये 72 तासांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. पूर तसेच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना तत्काळ मदत जाहीर करावी ही प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

इतर बातम्या :

महाराष्ट्र अंधारात जाण्याची वेळ का आली?; चंद्रशेखर बावनकुळेंनी केला मोठा गौप्यस्फोट

मुंबई महापालिकेने तिजोरी उघडली, रस्त्यांवर 2200 कोटी, तर कोव्हिड केंद्रांवर 100 कोटी खर्च करणार

72-hour hunger strike by farmers in Latur, one farmer’s health deteriorated