राहुल गांधी यांची सर्वात मोठी घोषणा, ‘4 जूनला इंडिया आघाडीचं सरकार बनणार, 30 लाख तरुणांना…’
"देशाच्या तरुणांनो, 4 जूनला इंडिया आघाडीचं सरकार बनायला जात आहे. आम्हाला गॅरंटी आहे, 15 ऑगस्टपर्यंत 30 लाख रिक्त सरकारी पदांच्या भरतीचं काम आम्ही सुरु करुन टाकू", असा मोठा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज ‘एक्स’वर व्हिडीओ ट्विट केलाय. या व्हिडीओसोबत त्यांनी देशाच्या लाखो तरुणांना उद्देशून महत्त्वाचा मेसेजही लिहिला आहे. देशात आता सत्ता परिवर्तन होणार, अशी खात्री राहुल गांधी यांना आहे. देशात पुढच्या काही दिवसांमध्ये इंडिया आघाडीचं सरकार येईल, असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केलाय. विशेष म्हणजे इंडिया आघाडीचं सरकार येताच तरुणांना सरकारी नोकरी देण्यासाठी कोणती योजना सुरु केली जाईल? याबाबतची घोषणा देखील राहुल गांधी यांनी केली आहे.
“देशाच्या तरुणांनो, 4 जूनला इंडिया आघाडीचं सरकार बनायला जात आहे. आम्हाला गॅरंटी आहे, 15 ऑगस्टपर्यंत 30 लाख रिक्त सरकारी पदांच्या भरतीचं काम आम्ही सुरु करुन टाकू. नरेंद्र मोदी यांच्या खोट्या प्रचारामुळे भरकटून जाऊ नका. आपल्या मुद्द्यांवर कायम राहा. इंडियाचं ऐका. द्वेष नाही तर नोकरी निवडा”, असं राहुल गांधी ‘एक्स’वर म्हणाले आहेत.
‘मोदींच्या हातून निवडणूक निसटली’, राहुल गांधींचा दावा
“देशाची शक्ती, देशाच्या तरुणांनो, नरेंद्र मोदी यांच्या हातून आता निवडणूक निसटत चालली आहे. ते आता हिंदुस्तानचे पंतप्रधान बनणार नाहीत. त्यांनी निर्णय घेतला आहे की, पुढच्या चार-पाच दिवसांत तुमचं लक्ष विचलित करायचं आहे. काही ना काही ड्रामा करायचा आहे. तुमचं लक्ष दुसरीकडे भरकटायला नको. बेरोजगारी हा सर्वात मोठा मुद्दा आहे”, असं राहुल गांधी म्हणाले.
देश के युवाओं!
4 जून को INDIA की सरकार बनने जा रही है और हमारी गारंटी है कि 15 अगस्त तक हम 30 लाख रिक्त सरकारी पदों पर भर्ती का काम शुरू कर देंगे।
नरेंद्र मोदी के झूठे प्रचार से भटकना मत, अपने मुद्दों पर डटे रहना।
INDIA की सुनो, नफ़रत नहीं, नौकरी चुनो। pic.twitter.com/C84xxSJvnc
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 9, 2024
“नरेंद्र मोदी यांनी तुम्हाला सांगितलं होतं की, 2 कोटी तरुणांना रोजगार देणार. पण ते खोटे म्हणाले. नोटबंदी केली, चुकीच्या पद्धतीने जीएसटी लावली. मोदी सरकारने सर्वचे सर्व काम उद्योगपती अदानी सारख्या लोकांसाठी केलं आहे. आम्ही भरती भरोसा स्किम आणत आहोत. देशात 4 जूनला इंडिया आघाडीचं सरकार येत आहे. 15 ऑगस्टपर्यंत भरती भरोसा स्किमच्या अंतर्गत 30 लाख तरुणांना रोजगार देण्याचं काम सुरु होईल”, असं राहुल गांधी म्हणाले.