AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BIG BREAKING : महापालिका निवडणुकांची रणधुमाळी ‘या’ महिन्यांमध्ये, महाराष्ट्राचा नेमका मूड काय? आता लवकरच समजणार

राज्यातील अनेक मोठ्या शहरांच्या महापालिकांचा कार्यकाळ पूर्ण झालाय. या महापालिकांची निवडणूक कधी होईल? याबाबत वारंवार प्रश्न उपस्थित होतोय. याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

BIG BREAKING : महापालिका निवडणुकांची रणधुमाळी 'या' महिन्यांमध्ये, महाराष्ट्राचा नेमका मूड काय? आता लवकरच समजणार
| Edited By: Chetan Patil | Updated on: Apr 21, 2023 | 8:53 PM
Share

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील अनेक मोठ्या शहरांच्या महापालिकांचा कार्यकाळ पूर्ण झालाय. या महापालिकांची निवडणूक कधी होईल? याबाबत वारंवार प्रश्न उपस्थित होतोय. काही महापालिकांचा कार्यकाळ तर कोरोना काळातच संपला आहे. पण तरीही निवडणूक आयोगाकडून अद्याप महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला नाही. पण आता याच विषयी मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकींचं बिगूल आता लवकरच वाजण्याची दाट शक्यता आहे. सूत्रांकडून याबाबत महत्त्वाची माहिती मिळाली आहे.

राज्यात आगामी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात महापालिका निवडणुका लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे महापालिका निवडणुकांबाबत पुण्यात भाजपच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुणे महापालिका निवडणुकीकडे स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष देणार असल्याची देखील माहिती मिळत आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात महापालिका निवडणुका लागू शकतात. त्या दृष्टीकोनाने तयारीला लागण्याचे निर्देश भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

महाराष्ट्राचा नेमका मूड काय? लवकरच स्पष्ट होणार

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडताना बघायला मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतरच महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वसामान्यांना सहज पचनी पडणार नाहीत, अशा घडामोडी घडल्या. शिवसेनेची भाजपसोबतची युती तुटली. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आलं. या दरम्यान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत भाजपने 36 तासांचं सरकारही स्थापन केलं. पण पुढे अशा काही राजकीय घडामोडी घडल्या की ते सरकार फार काळ टिकलं नाही.

नंतर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. या दरम्यान भाजपकडून सातत्याने हे सरकार फार काळ टिकणार नाही, असे दावे करण्यात आले. मधल्या काळात कोरोना संकट उभं ठाकलं. या संकटानंतर नऊ महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडला. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील 40 आमदारांसह बंड पुकारलं. ते सर्व आमदारांना घेऊन सूरत आणि नंतर गुवाहाटीला गेले. यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात युतीचं नवं सरकार स्थापन झालं. या काळात शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हही एकनाथ शिंदे यांना मिळालं.

या सगळ्या घडामोडींनंतर आता महाराष्ट्रातील राजकारण्यांची खरी परीक्षा असणार आहे. कारण राज्यातील अनेक महापालिकांच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांमधून नागरिकांच्या मतांमधून नेमका कल काय आहे? नेमकी भूमिका काय आहे, ते स्पष्ट होणार आहे. या निवडणुकांना मिनी विधानसभा निवडणूक असंही मानलं जातं. कारण या निवडणुकीत महाराष्ट्राला नेमका मूड काय? हे स्पष्ट होतं. त्यामुळे आगामी काळातल्या राजकीय घडामोडी महत्त्वाच्या ठरणार आहेत.

Follow Us
बारावीत 35%... MHT-CET मध्ये 100 पर्सेंटाईल? महाराष्ट्रात...
CET Exam Scam | बारावीत 35%... MHT-CET मध्ये 100 पर्सेंटाईल? महाराष्ट्रात महाघोटाळ्याच्या आरोपांनी खळबळ!
अजित पवारांसोबतचा जूना फोटो, खास कॅप्शन; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट
अजित पवारांसोबतचा जूना फोटो, खास कॅप्शन; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट चर्चेत
जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण?
CJP Protest | जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण? जाणून घ्या संपूर्ण कहाणी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय, सर्व मंत्र्यांना बोलवल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय, सर्व मंत्र्यांना बोलवलं अन् दीड वर्षाचा... काय घडलं?
शरद पवार यांचा पक्ष भाजपसोबत जाणार का? राऊतांनी स्पष्टच सांगितलं
Sanjay Raut on NCP | शरद पवार यांचा पक्ष भाजपसोबत जाणार का? राऊतांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
आता मुख्यमंत्र्यांना मान्य करावंच; पत्रकार परिषदेत संजय राऊत संतापले
आता मुख्यमंत्र्यांना मान्य करावंच; पत्रकार परिषदेत संजय राऊत संतापले, थेट...
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून
मोठी बातमी! कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून कोर्टात याचिका दाखल
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग