AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“शिंदेंचं बंड झालं नसतं तर यात्रा काढली असती का?”, अमित ठाकरेंचा आदित्य ठाकरेंना सवाल

अमित ठाकरेंची आदित्य ठाकरेंवर टीका

शिंदेंचं बंड झालं नसतं तर यात्रा काढली असती का?, अमित ठाकरेंचा आदित्य ठाकरेंना सवाल
अमित ठाकरे, आदित्य ठाकरे
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Aug 06, 2022 | 11:28 AM
Share

मुंबई : सध्या राज्याच्या राजकारणात बरेच बदल होत आहे. शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) अधिक आक्रमक झाल्याचं दिसतंय. ते अधिक ठामपणे शिवसेनेची बाजू मांडताना दिसत आहेत. ते सध्या दौरा करत आहेत. पक्षातील नेत्यांशी, सर्वसामान्य लोकांशी बोलून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. अश्यातच त्यांचे बंधू आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी त्यांच्या या दौऱ्यावर टीका केली आहे. अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी आदित्य ठाकरेंच्या रॅलीवर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. “शिवसेनेत बंड होण्याआधी मी माझे दौरे सुरू केलेत. पण माझा आदित्य ठाकरेंना प्रश्न आहे. जर एकनाथ शिंदे यांचं बंड झालं नसतं तर तुम्ही दौरा केला असता का, एवढाच माझा एक प्रश्न आहे”, असं अमित ठाकरे म्हणालेत.

तेजसचं राजकारणात स्वागत!

तेजस ठाकरे ठाकरे राजकारणात सक्रीय होत आहेत, अश्या चर्चा आहेत. त्यावर अमित ठाकरेंनी भाष्य केलंय. तेजस राजकारणात येत असतील तर त्यांचं स्वागत आहे, असं अमित ठाकरे म्हणालेत.

अमित ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना

“येणारी प्रत्येक निवडणूक आपल्यासाठी महत्वाची आहे. येत्या निवडणुकीत सक्षम उमेदवार द्यायचा आहे आणि तो निवडून आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करायचे आहेत. त्या निवडणुकांमध्ये प्रचार करण्यासाठी मी तयार आहे. कुठलीही निवडणूक लागली तरी मला बोलवा. आपण जोरदार प्रचार करू. आपल्या पक्षाने केलेलं काम आणि विचार घरोघरी पोहचवू. लोक नक्की आपल्यावर विश्वास ठेवतील आणि आपले लोक निवडूण येतील. आपल्याला प्रत्येक निवडणूक लढायची आहे आणि जिंकायचीदेखील आहे. त्यामुळे मनसैनिकांनो, कामाला लागा”, असं अमित ठाकरे म्हणाले आहेत. अमित ठाकरे आजपासून चार दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यात ते नाशिक शहर आणि जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

सध्या राज्याच्या राजकारणात ठाकरे घराणे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे केंद्रबिंदू राहिले. एकीकडे बंडखोर आमदारांवर उद्धव ठाकरे निशाणा साधत आहेत तर दुसरीकडे आदित्य ठाकरे निष्ठा यात्रेतून मतदारांशी संवाद साधत आहेत. त्याच ठाकरे घराण्यातील दुसरा चर्चेतील चेहरा म्हणजे मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरेही दौऱ्यावर आहेत. यात त्यांचं जंगी स्वागत करण्यात येतंय. युवकांबरोबर संवाद साधण्यासाठी गेले असता विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आनंदाने त्यांचे ढोल ताशांच्या गजरात त्याचे स्वागत करण्यात येतंय. महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी ढोल ताशांच्या तालावर नाचत अमित ठाकरे यांचे जोरदार स्वागत करत आहेत.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी