मुख्यमंत्र्यांच्या सभेला या अन् रोख पॅकेज मिळावा, रिकाम्या खुर्च्याची नामुष्की टाळण्यासाठी भुमरेंचा घुमजाव, आंबादास दानवेंचे खळबळजनक आरोप

| Updated on: Sep 10, 2022 | 10:47 PM

मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमा करावी असे आदेशच जणू संदीपान भुमरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. यासाठी काहीही करा पण गर्दी झाली पाहिजे असा निर्धार मंत्री भुमरे यांनी केला आहे. यापूर्वीच्या सभेतील अनुभव हा विचित्र होता. शिवाय त्याची पुन्नरावृत्ती होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जात आहे.

मुख्यमंत्र्यांच्या सभेला या अन् रोख पॅकेज मिळावा, रिकाम्या खुर्च्याची नामुष्की टाळण्यासाठी भुमरेंचा घुमजाव, आंबादास दानवेंचे खळबळजनक आरोप
मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमवण्याचे आदेश दिले गेले असल्याचा आरोप आंबादास दानवे यांनी केला आहे.
Follow us on

मुंबई : मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर (Sandipan Bhumare) संदीपान भुमरे हे प्रथम आपल्या (Constituency) मतदार संघात दाखल झाले होते. त्यांचे जंगी स्वागत सोडा कार्यक्रमासाठी आणलेल्या खुर्च्या देखील रिकाम्या होत्या. आता 12 सप्टेंबर रोजी (Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पैठण येथे जाहीर सभा होत आहे. पुन्हा तीच नामुष्की ओढावू नये म्हणून पैसे देऊन सभेसाठी नागरिक जमवण्याचे आदेश दिले गेले असल्याचा खळबळजनक आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे यांनी केला आहे.

आमक्याचे लग्न आणि तमकेच वऱ्हाडी

मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमा करावी असे आदेशच जणू संदीपान भुमरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. यासाठी काहीही करा पण गर्दी झाली पाहिजे असा निर्धार मंत्री भुमरे यांनी केला आहे. यापूर्वीच्या सभेतील अनुभव हा विचित्र होता. शिवाय त्याची पुन्नरावृत्ती होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जात आहे. त्यामुळे ज्यांचा संबंध नाही असेही नागरिक या सभेला उपस्थित राहू शकतात असे दानवे यांनी सांगितले आहे.

12 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांची सभा

12 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याची सभा पैठण येथे होत आहे. हा मतदारसंघ मंत्री संदीपान भुमरे यांचा आहे. या सभेच्या अनुषंगाने 42 गावच्या अंगणवाडी सेविकांना येण्याचे शासकीय आदेश देण्यात आले आहेत. संदीपान भुमरे यांच्या सभेला गर्दी झाली नव्हती. तशीच अवस्था मुख्यमंत्र्यांच्या सभेची होऊ नये म्हणून अगोदरपासूनच काळजी घेतली जात आहे.