आपल्या देशात चमच्यांची कमी आहे का? : नितीन गडकरी

| Updated on: Nov 16, 2019 | 12:29 PM

केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी (Political Sarcasm of Nitin Gadkari) प्रशासकीय कामकाज आणि राजकीय कामाच्या पद्धतींवर अगदी खुलेपणाने आपली मतं व्यक्त करत असतात.

आपल्या देशात चमच्यांची कमी आहे का? : नितीन गडकरी
Follow us on

नागपूर : केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी (Political Sarcasm of Nitin Gadkari) प्रशासकीय कामकाज आणि राजकीय कामाच्या पद्धतींवर अगदी खुलेपणाने आपली मतं व्यक्त करत असतात. आता त्यांनी बांबूच्या चमच्यांच्या आयातीवरुन पुन्हा एकदा खुशामत करणाऱ्यांवर कटाक्ष टाकला. यावेळी गडकरींनी (Political Sarcasm of Nitin Gadkari) एकदा आपण देशात चमच्यांना कमी आहे का? असं विनोदाने विचारल्याची आठवण सांगितली.

नितीन गडकरी म्हणाले, “आपल्या देशात बांबूच्या चमच्यांचं उत्पादन होत नव्हतं. आपण चीनवरुन बांबूपासून तयार होणारे चमचे आयात करत होतो. तेव्हा मी विनोद म्हणून आपल्या देशात चमच्यांची कमी आहे का? असं म्हटलं होतं.”

‘संरक्षण विभागात 8 वर्षे फाईल फिरते, मंजूर होते तेव्हा उपयोग संपलेला असतो’

नितीन गडकरी संरक्षण विभागाच्या लालफितीच्या कारभारावरही तोशेरे ओढले. संरक्षण विभागात एखाद्या प्रस्तावाची फाईन आठ-आठ वर्षे फिरत राहते. जेव्हा ती फाईल मंजूर होते, तेव्हा ज्या उत्पादनासाठी परवानगी मागितली जाते ते उत्पादन कालबाह्य झालेलं असतं, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

‘बसेस सीएनजीवर चालल्या, तर तोटा कमी होईल’

नितीन गडकरी यांनी नेहमीच सीएनजी आणि बायोडिझेलच्या वापराची आग्रही मागणी केली आहे. सध्या नागपूर महानगरपालिकेचा वार्षिक तोटा 60 कोटींचा आहे. यावर बोलताना त्यांनी पालिकेने आपल्या बसेस सीएनजीवर चालवल्या, तर हा तोटा कमी होऊ शकतो, असं मत व्यक्त केलं.