पंतप्रधान मोदी यांनी 9 वर्षांत फक्त हे काम केलं, नाना पटोले यांची पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका

काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. दुसऱ्याची घर फोडायची ही भाजपची नीती आहे. विधानपरिषद निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

पंतप्रधान मोदी यांनी 9 वर्षांत फक्त हे काम केलं, नाना पटोले यांची पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका
नाना पटोले
Govinda Hatwar | Updated on: Jan 19, 2023 | 5:12 PM

मुंबई : नाशिक पदवीधर मतदार संघात (Nashik Graduate Constituency) अखेर स्पष्टता आली. सत्यजित तांबे (Satyajit Tambe) हे अपक्ष उमेदवार आहेत. भाजपनं त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला नाही. तर, भाजपातून ठाकरे गटाच्या शिवसेनेत गेलेल्या शुभांगी पाटील यांना आता महाविकास आघाडीनं पाठिंबा जाहीर केला आहे. शुभांगी पाटील या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार असतील. नाशिक विभाग हा काँग्रेस विचाराचा आहे. सुधीर तांबे यांची स्पष्टता झाली. त्यामुळं आता महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट केली आहे. सर्व लोकं एकसंघ काम करतील, अशी अपेक्षा नाना पटोले ( Nana Patole ) यांनी व्यक्त केली आहे.

महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट झाली. गोंधळ कुणी झाला, यावर बोलणार नाही. पाचही महाविकास आघाडीची नाव आम्ही जाहीर केले, असंही नाना पटोले यांनी सांगितलं.


नाशिकमध्ये भाजपचा उमेदवार नाही

नाशिकमध्ये भाजपचा गोंधळ आता स्पष्ट होणार आहे. भाजपला उमेदवार मिळाला नाही. भाजपचा उमेदवार तिथं नाही. त्यामुळं त्यांचा काय गोंधळ होतो, हे पाहावं लागेल, असंही पटोले म्हणाले.

या पत्रकार परिषदेला विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. अंबादास दानवे म्हणाले, विक्रम काळे औरंगाबादमध्ये उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी मी दहा तालुक्यांत फिरतो.

नाना पटोले यांची पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका

काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. दुसऱ्याची घर फोडायची ही भाजपची नीती आहे. विधानपरिषद निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासकामांचं उद्घाटन करतात. पंतप्रधान पदाच्या गरिमेला भाजप धक्का देत असल्याचं पटोले म्हणाले.

मोदी यांनी गेल्या ९ वर्षात भाजपच्या प्रचाराव्यतिरिक्त काही केलं नाही. येते आल्यानंतर त्यांनी राज्याच्या जनतेला उत्तर द्यावं. राज्यातला शेतकरी आत्महत्या का करतो. याची उत्तरं पंतप्रधानांनी द्यावं. नुसत्या घोषणा चालणार नाही, असा सवालही नाना पटोले यांनी विचारला.

जाहिरातीसाठी राज्याच्या तिजोरीची लूट

राज्याच्या तिजोरीची लूट जाहिरातीच्या माध्यमातून केली जात आहे. मुंबई हे देशाची आर्थिक राजधानी आहे. आता बॅनरबाजी खूप झाली आहे, अशी टीका नाना पटोले यांनी राज्य सरकारवर केली.

Follow Us