AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विरोधी नेत्याची सकाळ टोमणेबाजीनं, चंद्रशेखर बावनकुळे यांचा कुणावर निशाणा?

मुंबई मनपाचा पैसा म्हणजे कुणाची प्रापर्टी नाही. हा जनतेचा पैसा आहे. जनतेच्या पैशातून जनतेचा विकास करण्यासाठी पंतप्रधान मोदी येत आहेत.

विरोधी नेत्याची सकाळ टोमणेबाजीनं, चंद्रशेखर बावनकुळे यांचा कुणावर निशाणा?
चंद्रशेखर बावनकुळे Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jan 19, 2023 | 4:25 PM
Share

मुंबई : विरोधी पक्षाकडून अपेक्षा होती की, पंतप्रधान (Prime Minister Modi) आल्यावर या चार गोष्टी केल्या पाहिजे, असं म्हणायला पाहिजे होतं. पण, टोमणे मारायची सवय पडली आहे. सकाळपासून तिचं कॅसेट सुरू असते. त्याची आम्हाला सवय झाली आहे. विरोधी पक्ष म्हणून विधायक सूचना येतील, अशी अपेक्षा राहिली नाही, असा टोला भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी लगावला. विरोधी पक्षाकडून सकाळी विधायक सूचना येत नाही. टोमणेबाजीनं सकाळी सुरू होते. पक्षाचा प्रमुख म्हणून संजय राऊत (Sanjay Raut) यांना विनंती राहील की, सकाळी बोलताना राज्याच्या विकासावर बोललं पाहिजे, असा सल्ला बावनकुळे यांनी दिला.

निवडणुकी कधी लागणार माहिती नाही. सर्वोच्च न्यायालयात केस आहे. सर्वोच्च न्यायालय केव्हा निकाल देईल, हे माहिती नाही. निवडणुकीचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याचा संबंध काय, असा सवालही चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारला.

पंतप्रधानांचा दौरा राज्याच्या विकासासाठी

पंतप्रधानांनी नागपूर दौरा केला. समृद्धी महामार्गाचं लोकार्पण झालं. ७५ हजार कोटी रुपयांची कामांची सुरुवात करण्यात आली. मुंबईचा दौरा हा विकासाचा आहे. महाराष्ट्र एकनंबरवर यावा. यासाठी मुंबई आणि महाराष्ट्राच्या दौरा आहे.

केंद्राची मदत पाहिजे होती, तर पंतप्रधानांना का बोलावलं नाही. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडं गेलं पाहिजे. विकासाची काम आणली पाहिजे. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटतो. त्यांच्याकडून आपल्या जिल्ह्यातील कामं खेचून आणतो. तसंच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडं गेलं पाहिजे. राज्यात विकासाची काम केली पाहिजे.

अशा दौऱ्यातून विकास मिळतो

तुम्ही अडीच वर्षांत कधी पंतप्रधानांना भेटले का. त्यांच्याकडून काही मदत मागितली का, असा हल्लाबोल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान मोदी यांची मदत मागत आहेत. अशा पंतप्रधानांच्या दौऱ्यातून विकास मिळतो.

मुंबई मनपाचा पैसा म्हणजे कुणाची प्रापर्टी नाही. हा जनतेचा पैसा आहे. जनतेच्या पैशातून जनतेचा विकास करण्यासाठी पंतप्रधान मोदी येत आहेत. राज्याच्या विकासाचा संकल्प यानिमित्तानं केला जात आहे, असंही त्यांनी सांगितलं.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...