AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी रिफायनरीसाठी पत्र लिहिलं आणि आता विरोध, हा नेमका विचार कसा बदलला?; नितेश राणे यांचा ठाकरेंना सवाल

Nitesh Rane on Uddhav Thackeray : रिफायनरी प्रकल्प, उद्धव ठाकरे यांचं पत्र अन् दलालीची भाषा; नितेश राणे नेमकं काय म्हणाले?

आधी रिफायनरीसाठी पत्र लिहिलं आणि आता विरोध, हा नेमका विचार कसा बदलला?; नितेश राणे यांचा ठाकरेंना सवाल
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: May 06, 2023 | 12:59 PM
Share

बारसू : रत्नागिरीतील बारसूमध्ये रिफायनरी प्रकल्प होऊ घातला आहे. या प्रकल्पाविरोधात स्थानिकांनी आंदोलन करत आहेत. या आंदोलकांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे बारसूमध्ये जात आहेत. यावर भाजप नेते नितेश राणे यांनी टीका केली आहे. आधी रिफायनरीसाठी पत्र लिहिलं आणि आता विरोध, हा नेमका विचार कसा बदलला?, असा थेट सवाल नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.

राजापूरमधल्या जवाहर चौकात रिफायनरी समर्थक एकत्र जमले आहेत. तिथं ते प्रकल्पाच्या बाजूने घोषणाबाजी करण्यात आली. निलेश राणे, नितेश राणे, प्रमोद जठार हे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढला जाणार आहे. सिंधुदुर्गातून राणे समर्थक मोठया संख्येने या आंदोलनात सहभागी झाले आहेत. तिथं बोलताना नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

नितेश राणे नेमकं काय म्हणाले?

नितेश राणे यांनी बारसूतील रिफायनरी प्रकल्पावरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी पत्र लिहून बारसूत रिफायनरी प्रकल्प व्हावा म्हणून पत्र काढलं आणि आता विरोध करता आहेत. हा नेमका विचार कसा बदलला? हा विचार कोकणच्या विकासासाठी नाही बदलला तर मातोश्रीवर पैसे आले पाहिजेत. म्हणून बदलला आहे”, असं नितेश राणे म्हणाले आहेत.

महाराष्ट्रातला सर्वात मोठा दलाल बारसूत आलेला आहे. असे दलाल कोकणात यायला द्यायचे का? याचा कोकण वासीयांनी विचार करायला हवा, असंही नितेश राणे म्हणाले आहेत.

एक पर्यटक मुंबईवरून इथे आलेला आहे.बारसू गावात जाऊन पेटवापेटवी करत आहेत, असा टोला नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

उद्धव ठाकरे मन की बात समजतात की धन की बात समजतात हे त्यांनी सांगावं. सगळा पैसा आदित्य आणि तेजस ठाकरेंनी कमवायचा आहे का? कोकणातल्या तरुणांनी पैसे नाही कमवायचे का? असा सवाल मला उद्धव ठाकरेंना विचारायचा आहे, असंही राणें म्हणाले.

आज आपण गप्प बसलो ,आज विरोध केला नाही तर आपण आपल्या मुलांना काय उत्तर देणार. तुम्हाला अपेक्षित असणारा विकास या रिफायनरीच्या माध्यमातून होणार आहे. हा मोर्चा ही एक फक्त झलक होती. जोपर्यंत आपण आपली ताकद दाखवत नाहीत. तोपर्यंत राज्यसरकारकडे संदेश जाणार नाही. कोणावरही दडपशाही न करता प्रकल्प पुढे न्याययचा आहे ही सरकारची आणि भाजपची भूमिका आहे, असंही नितेश राणे यावेळी म्हणाले.

Follow Us
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...
राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार? पुण्यातील गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार? पुण्यातील गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?.
NEET परीक्षेबाबत मोठा निर्णय! परीक्षेसाठी 15 मिनिटे अतिरिक्त वेळ......
NEET परीक्षेबाबत मोठा निर्णय! परीक्षेसाठी 15 मिनिटे अतिरिक्त वेळ.......
भारतात पेट्रोल-डिझेल दरात विक्रमी वाढ, मुंबई, पुणे, नागपूर, अमरावीतील
भारतात पेट्रोल-डिझेल दरात विक्रमी वाढ, मुंबई, पुणे, नागपूर, अमरावीतील.
देशवासियांना सकाळ सकाळीच महागाईचा धक्का; नवी दिल्लीत पेट्रोल-डिझेल....
देशवासियांना सकाळ सकाळीच महागाईचा धक्का; नवी दिल्लीत पेट्रोल-डिझेल.....