AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राणे आणि भुजबळांना शरद पवारांनी शिवसेनेतून फोडलं, रामदास कदम यांचा दावा

विधानसभेच्या तोंडावर कोकणात पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी धक्कादायक खुलासे केले आहेत.

राणे आणि भुजबळांना शरद पवारांनी शिवसेनेतून फोडलं, रामदास कदम यांचा दावा
| Updated on: Sep 05, 2019 | 11:41 AM
Share

रत्नागिरी :  विधानसभेच्या तोंडावर कोकणात पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. टीव्ही 9 मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत रामदास कदम यांनी, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि भाजपचे सहयोगी खासदार नारायण राणेंना (Narayan Rane) शिवसेनेतून फोडण्यात शरद पवार (Sharad Pawar) यांचा हात असल्याचा दावा केला आहे.

नारायण राणे यांना शिवसेनेतून काँग्रेसने नव्हे तर शरद पवारांनी फोडलं, असा दावा कदम यांनी केला.

नारायण राणे, शरद पवार आणि राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार बाबासाहेब कुपेकर यांची पहिली बैठक कोल्हापुरात झाली होती. मात्र अपेक्षित मंत्रीपद मिळालं नाही, त्यामुळे राणे दिल्लीत काँग्रेसच्या दरबारी गेले, असं रामदास कदम यांनी सांगितलं.

शरद पवार यांनी सत्तेत असताना जे केलं तेच चित्र आता त्यांना पाहायला मिळतंय. शिवसेनेचे आमदार फोडण्याचे काम शरद पवारांनी केलं .भुजबळांना शिवसेनेतून फोडण्यामागे शरद पवार यांचाच हात होता. ज्यांनी बाळासाहेबांना दु:ख दिलं ते सर्व भुईसपाट होत आहेत, असं रामदास कदम म्हणाले.

यावेळी रामदास कदम यांनी नारायण राणेंचा खरपूस समाचार घेतला. नारायण राणे आता कुठल्या पक्षात जाणार याची मला माहिती नाही, मात्र राणेंनी आता रामदास आठवले यांच्याकडे संपर्क साधावा, असा टोला कदम यांनी लगावला.

नारायण राणे यांना शिवसेनेत घेण्यास शिवसैनिकांचा प्रचंड विरोध आहे. भाजपमध्ये ते गेले तर युती करायची की नाही याबाबत सुद्धा शिवसैनिकांच्या मनात खदखद आहे. भाजपनेही राणेंना पक्षात घेऊ नये अशी शिवसैनिकांची भावना आहे, असं रामदास कदम म्हणाले.

युती होणारच

दरम्यान शिवसेना आणि भाजप युती होणार. त्यासाठी अडीज अडीज वर्षाचा फॉर्म्युला ठरला आहे. भाजपचा अडीज वर्ष आणि शिवसेनेचा अडीज वर्ष मुख्यमंत्री होईल. भाजप अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात अशी चर्चा झाली आहे, असं रामदास कदम म्हणाले.

ही युती होऊ नये म्हणून अनेक जण देव पाण्यात बुडवून आपली पोळी कशी भाजता येईल याची चाचपणी करत आहे, असा आरोप कदम यांनी केला.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.