AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंधेरी पोटनिवडणूकीत धक्कादायक ट्विस्ट; थेट निवडणुक रद्द करण्याची मागणी

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. गंभीर आरोप करत त्यांनी थेट निवडणुक रद्द करण्याची मागणी केली आहे.

अंधेरी पोटनिवडणूकीत धक्कादायक ट्विस्ट; थेट निवडणुक रद्द करण्याची मागणी
Image Credit source: tv9 marathi
vanita kamble
vanita kamble | Updated on: Oct 29, 2022 | 12:01 AM
Share

मुंबई : अंधेरी पोटनिवडणूकीत धक्कादायक ट्विस्ट आला आहे. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. गंभीर आरोप करत त्यांनी थेट निवडणुक रद्द करण्याची मागणी केली आहे. सुरुवातीपासूनच विविध कारणांमुळे अंधेरी पोट निवडणूक चर्चेत आली आहे. त्यातच आता अपक्ष उमेदवाराच्या तक्रारीमुळे आणखी ट्विस्ट आला आहे.

अंधेरी पोट निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी निवडणुकीतून माघार घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे. कांबळे यांच्या या तक्रारीमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे ही पोट निवडणुक लागली आहे. अंधेरी विधानसभा पोटनिवडणूकीत दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे.

भाजपचे मुरली पटेल यांना ऋतुजा लटके यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. मात्र, ऐन वेळी भाजपच्या उमेदवाराने माघार घेतली.

मात्र, ऋतुजा लटके यांच्या विरोधात आणखी सहा उमेदवार निवडणुक लढवत आहेत. मुरजी पटेल यांनी पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यामुळे लटके यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

कांबळे यांनी ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीवरच आक्षेप घेतला आहे. उद्धव ठाकरे गटाकडून निवडणुकीतून माघार घेण्यासाठी दबाब आणला असल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे.

यासंदर्भात त्यांनी थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. तक्रारीवर सात दिवसांच्या आत प्रतिसाद न मिळाल्यास न्यायालयात जाणार आहोत असा इशाराही त्यांनी दिला आहे. मिलिंद कांबळे यांच्या या तक्रार अर्जावर निवडणूक अयोग्य काय निर्णय देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
धाकधुक वाढली! शिवसेनेचं चिन्ह गोठणार की... वकील अनंत कळसेंचं सुचक वक्त
धाकधुक वाढली! शिवसेनेचं चिन्ह गोठणार की... वकील अनंत कळसेंचं सुचक वक्तव्य, अखेर मोठी अपडेट समोर
मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठ विधान
मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेतील अपात्रतेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठं विधान; काय म्हणाले?
जुन्नरच्या अत्याचार प्रकरणावरून राऊतांचा फडणवीस, शिंदेंवर हल्लाबोल,
जुन्नरच्या अत्याचार प्रकरणावरून राऊतांचा फडणवीस, शिंदेंवर हल्लाबोल, अमृता फडणवीसांनाही म्हणाले...
उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार? अमित ठाकरे...
Pocket Money Scheme : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार? अमित ठाकरे म्हणाले..
श्रीमद्भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू टळतो; अजित पवारांचा उल्लेख करत...
श्रीमद्भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू टळतो; अजित पवारांचा उल्लेख करत डॉ. सूरदास यांनी काय काय सांगितलं?
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा