जे पंजाबमध्ये घडलं ते गुजरातमध्ये घडणार काय, अरविंद केजरीवाल यांनी लिहूनचं दिलं

| Updated on: Nov 27, 2022 | 10:29 PM

गुजरातमध्ये सत्ता परिवर्तन होणार आहे, असं लिहून त्याखाली अऱविंद केजरीवाल यांनी स्वतःची सही केली आहे.

 जे पंजाबमध्ये घडलं ते गुजरातमध्ये घडणार काय, अरविंद केजरीवाल यांनी लिहूनचं दिलं
अरविंद केजरीवाल
Follow us on

यंदा गुजरातमध्ये आम आदमी पक्षाची सत्ता येईल. असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कागदावर लिहून दिलं. त्यानंतर त्यांनी स्वतःची सही केली. याआधीसुद्धा अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमध्ये लिखित स्वरुपात सत्तेचा दावा केला होता. अरविंद केजरीवाल म्हणाले, गुजरातमध्ये आम आदमी पक्षाची सरकार बनतं आहे. ही भविष्यवाणी तुम्ही नोट करून ठेवा. ही भविष्यवाणी खरी ठरेल, असा दावा अऱविंद केजरीवाल यांनी केला. आठवड्याभरात अऱविंद केजरीवाल यांनी दुसऱ्यांदा हा दावा केलाय. त्यामुळं राजकीय धुरिणांच्या भुवया उंचावल्या.

गुजरातमध्ये सत्ता परिवर्तन होणार आहे, असं लिहून त्याखाली अऱविंद केजरीवाल यांनी स्वतःची सही केली आहे. पंजाबमध्ये मी काही भविष्यवाणी केली होती. गुजरातमध्ये आम आदमी सरकारची सरकार बनत आहे. २७ वर्षांच्या शासनानंतर जनतेकडून लोकांना रिलीफ मिळेल.

गुजरातमध्ये आपचं सरकार येईल, हे अऱविंद केजरीवाल यांना पडलेलं स्वप्न आहे. गुजरातमध्य आपचं सरकार येऊ शकत नाही, असं भाजपचं म्हणणंय. जनमत भाजपच्या पाठीमागे असल्याचं त्यांचं म्हणणंय.

प्रत्येक पक्ष निवडणुकीत विजयाचा दावा करतो. मात्र, केजरीवाल यांनी हे सर्व लिखित स्वरुपातंच दिलं. पंजाबमध्ये मुख्यमंत्री चन्नी दोन्ही जागांवरून पराभूत होतील, असं केजरीवाल यांनी म्हटलं. शेवटी झालं तसचं. प्रत्येक्षात चन्नी दोन्ही जागांवरून पडले.

भगवंत मान हे ५१ हजारांपेक्षा जास्त मतांनी जिंकतील. मान ५८ हजार मतांनी जिंकले. बादल परिवाराचे पाचही सदस्य पराभूत होतील, असंही लिहूनं दिलं होतं. खरोखरचं बादल परिवाराचे पाचही कुटुंबीय पराभूत झाले. निकालानंतर आपची सरकार येईल, ही चौथी गोष्ट लिहून दिली होती. झालं तसंच पंजाबमध्ये आपची सत्ता आली.

त्याआधी दिल्लीत काँग्रेसच्या शून्य जागा येतील, हे केजरीवाल यांनी लिहून दिलं होतं. तेही खरं ठरलं होतं. भाजप म्हणते आमच्या स्पर्धेत काँग्रेस आहे. पण, काँग्रेस कुठही नसल्याचं आम आदमी पक्षाचं म्हणणं आहे.