AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology : या कारणांमुळे होतो विवाहाला विलंब, जोतिषशास्त्रातल्या या उपायांमुळे जुळून येतो विवाह योग

साधारणतः वयाची पंचवीशी ओलांडली की घरच्या मंडळींनाही मुलांच्या लग्नाचे वेध लागतात. असे असले करी अनेकांना लग्न जुळण्यासाठी मोठ्या मनस्तापाला समोर जावे लागते. बऱ्याचदा चांगले स्थळ येत नाही तर कधी मुलाला मुलगी आणि मुलीला मुलगा पसंत पडत नाही.

Astrology : या कारणांमुळे होतो विवाहाला विलंब, जोतिषशास्त्रातल्या या उपायांमुळे जुळून येतो विवाह योग
विवाह योग
| Updated on: Oct 15, 2023 | 11:58 AM
Share

मुंबई : लग्न हा प्रत्त्येकाच्याच आयुष्यातला सुंदर आणि भावनीक प्रसंग आहे. वयात आल्यानंतर प्रत्त्येक मुलं मुली आपल्या लग्नाबद्दल आणि जोडीदाराबद्दल स्वप्न रंगवू लागतात. साधारणतः वयाची पंचवीशी ओलांडली की घरच्या मंडळींनाही मुलांच्या लग्नाचे वेध लागतात. असे असले करी अनेकांना लग्न जुळण्यासाठी मोठ्या मनस्तापाला समोर जावे लागते. बऱ्याचदा चांगले स्थळ येत नाही तर कधी मुलाला मुलगी आणि मुलीला मुलगा पसंत पडत नाही. अनेकदा पत्रिका न जुळणे हा देखील एक मोठा मुद्द असतो. अनेकांच्या पत्रिकेत गुरू बळ नसल्याने विवाह जुळण्यास विलंब होतो. जोतिषशास्त्रानुसार (Astrology) काही उपाय आहेत ज्यामुळे विवाह योग जुळून येण्यास फायदा होतो. ते कोणते उपाय आहेत आपण जाणून घेऊया.

पत्रिकेत गुरू बळ वाढवण्यासाठी करा हे उपाय

  • गुरू हा सर्वात मोठा ग्रह मानला जातो. गुरू ग्रहाचा दिवस गुरुवार मानला जातो. या दिवशी गायीला चारा द्यावा.
  • गुरू ग्रह पिवळ्या रंगाचे प्रतिनिधित्व करतो, त्यामुळे ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत गुरू ग्रह दुर्बल असेल त्यांनी गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत.
  • गुरुवारी भगवान लक्ष्मी नारायणाची विधिवत पूजा करा. यासोबतच पाण्यात हरभरा डाळ, हळद आणि गूळ टाकून केळीच्या झाडाला पाणी अर्पण करावे.
  • पाण्यात थोडी हळद टाकून आंघोळ केल्याने गुरु ग्रह बलवान होतो आणि त्यांचा आशीर्वाद मिळतो.
  • जर तुम्हाला रत्न परिधान करायचे असेल आणि पत्रिकेतील गुरू कमजोर असेल तर तुम्ही ज्योतिषाच्या सल्ल्याने पुष्कराज धारण करू शकता.
  • गुरुवारी लहान मुलींना पिवळ्या वस्तू दान कराव्यात. हे अत्यंत शुभ मानले जाते.
  • गुरुवारी केळीच्या झाडाची मुळे पिवळ्या कपड्यात बांधून उजव्या हाताला घालावीत.
  • गुरुवारी साबण, तेल इत्यादी वापरू नका. तसेच या दिवशी नखे आणि केस कापू नयेत. पुरुषांनी या दिवशी दाढी करू नये.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.