मोठी घडामोड! खासदारांनंतर आता आमदारही फुटणार? ठाकरेंच्या सेनेचा बडा नेता धरणार महायुतीची वाट
महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोडींमध्ये आणखी एका नव्या चर्चेची भर पडली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधान परिषदेतील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आमदार अंबादास दानवे यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीऐवजी महायुतीच्या पॅनलला पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोडींमध्ये आणखी एका नव्या चर्चेची भर पडली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधान परिषदेतील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आमदार अंबादास दानवे यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीऐवजी महायुतीच्या पॅनलला पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
अलीकडेच ठाकरे गटातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पक्षात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीची चर्चा सुरू असतानाच दानवेंच्या या भूमिकेने नव्या राजकीय समीकरणांच्या चर्चांना चालना मिळाली आहे.
जिल्हा बँक निवडणुकीत यंदा महायुती आणि महाविकास आघाडी अशी दोन स्वतंत्र पॅनल मैदानात उतरली आहेत. १२ जागांसाठी निवडणूक होत असून आतापर्यंत ८ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित जागांसाठी थेट लढत होत असताना अंबादास दानवे यांनी महाविकास आघाडीच्या पॅनलऐवजी महायुतीच्या पॅनलमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ठाकरे गटातील वरिष्ठ नेते असलेल्या दानवेंनी घेतलेल्या भूमिकेमागे केवळ स्थानिक राजकारण आहे की यामागे व्यापक राजकीय संदेश दडलेला आहे, याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.
दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे यांनी हा निर्णय पूर्णपणे स्थानिक पातळीवरील असल्याचे स्पष्ट केले आहे. जिल्हा बँक निवडणुकांमध्ये पक्षीय राजकारणापेक्षा स्थानिक समीकरणांना अधिक महत्त्व असते, असे सांगत त्यांनी कोणताही राजकीय संदेश नसल्याचे म्हटले आहे.
मात्र, ठाकरे गटातील खासदारांच्या पक्षांतरानंतर लगेचच दानवेंनी घेतलेल्या या भूमिकेमुळे राजकीय निरीक्षकांचे लक्ष वेधले गेले आहे. विशेष म्हणजे, या घडामोडींवर अद्याप ठाकरे गटातील वरिष्ठ नेतृत्वाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
अंबादास दानवे यांच्या या निर्णयाकडे आगामी काळातील राजकीय घडामोडींचा संकेत म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे पक्षातील वरिष्ठ नेते आणि स्वतः उद्धव ठाकरे या विषयावर काय भूमिका घेतात, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Published on: Jun 25, 2026 11:11 AM
आता आमदारही फुटणार? ठाकरेंच्या सेनेचा बडा नेता धरणार महायुतीची वाट
मोठी बतामी! ठाकरेंच्या खासदारांनंतर आता राष्ट्रवादीचे... शरद पवारांनी
एकीचा संदेश, पण 24 आमदार गायब! महाविकास आघाडीच्या बैठकीत नेमकं काय घडल
5 जणांना मारलं, बॉम्ब... राऊतांचा संजय दिना पाटलांवर लेटर बॉम्ब...

