AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology : पती आणि पत्नी दोघांचीही एकच रास असेल तर काय होते? राशीनुसार असे होतात परिणाम

  ज्योतिषशास्त्रामध्ये (Astrology) एकूण 12 राशींचा उल्लेख करण्यात आला आहे. सर्व राशींचे ग्रह स्वामी भिन्न आहेत आणि त्यांच्या आधारावर त्या त्या राशीच्या जातकाचा स्वभाव तयार होतो. चला तर जाणून घेऊया जर एकाच राशीच्या दोन व्यक्तींचे लग्न झाले तर त्यांचे वैवाहिक जीवन कसे असेल.

Astrology : पती आणि पत्नी दोघांचीही एकच रास असेल तर काय होते? राशीनुसार असे होतात परिणाम
जोतिशषास्त्रImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 15, 2023 | 4:40 PM
Share

मुंबई : हिंदू धर्मात लग्नासाठी शुभ मुहूर्त पाहणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच लग्नासाठी मुलगा आणि मुलगी यांच्या पत्रिका जुळणे आवश्यक आहे. याशिवाय मुलगा आणि मुलगी यांची राशी एकच नाही ना आणि असेल तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात याकडेही विशेष लक्ष देणे आवश्यक असते. आज आपण पती-पत्नीला लग्नानंतर समजले की त्यांची राशी सारखीच आहे तर त्याच प्रभावाबद्दल जाणून घेणार आहोत. किंवा एकाच राशीच्या मुला मुलीने लग्न करावे की नाही हे ही जाणून घेऊया.  ज्योतिषशास्त्रामध्ये (Astrology) एकूण 12 राशींचा उल्लेख करण्यात आला आहे. सर्व राशींचे ग्रह स्वामी भिन्न आहेत आणि त्यांच्या आधारावर त्या त्या राशीच्या जातकाचा स्वभाव तयार होतो. चला तर जाणून घेऊया जर एकाच राशीच्या दोन व्यक्तींचे लग्न झाले तर त्यांचे वैवाहिक जीवन कसे असेल.

मेष (ग्रहाचा स्वामी- मंगळ)

ज्योतिष शास्त्रानुसार या परिश्रमी राशी मानल्या जातात.असे म्हटले जाते की जर या लोकांनी एकमेकांशी लग्न केले तर जीवन आनंदी राहते.

वृषभ (ग्रह स्वामी शुक्र)

या राशीच्या दोन लोकांचे लग्न झाले तर त्यांचे जीवन प्रेमाने भरलेले असते. असे म्हणतात की हे दोघे प्रेमाने राहतात. त्यांचे वैवाहिक जीवन अतिशय कार्यक्षमतेने शुभ मार्गाने जाते.

मिथुन (ग्रहाचा स्वामी- बुध)

जर या राशीच्या दोन लोकांचे लग्न झाले तर त्यांच्या जीवनात आनंदाची कमतरता नसते. याचे कारण म्हणजे ही राशी थोडी शांत असली तरी जास्त काळजीत राहते. त्यामुळेच त्यांचे आयुष्य नीट घालवता येत नाही.

कर्क (ग्रहाचा स्वामी-चंद्र)

ज्योतिष शास्त्रानुसार जर या दोघांचे लग्न झाले तर त्यांच्यात वादविवाद आणि अस्वस्थता वाढेल.

सिंह (ग्रहाचा स्वामी-सूर्य)

सिंह राशीच्या दोन लोकांमध्ये वैवाहिक जीवन असेल तर काही परिस्थितींमध्ये वाद होऊ शकतात, परंतु सामान्यतः त्यांचे जीवन आनंदी राहते.

कन्या (ग्रहाचा स्वामी- बुध)

कन्या राशीच्या दोघांचे  एकमेकांशी लग्न केले तर त्यांच्यात असंतोषाची भावना निर्माण होते.

तूळ (ग्रहाचा स्वामी- शुक्र)

या राशीचे लोक त्यांच्या आयुष्यात आनंदी असतात. त्यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी राहते.

वृश्चिक (ग्रहाचा स्वामी- मंगळ)

जर दोघेही या राशीचे असतील तर बहुतेक वाद त्यांच्यातच होतात. एवढेच नाही तर चिंता आणि तणावाचा सामना करावा लागतो.

धनु (ग्रहांचा स्वामी- स्वामी)

जर धनु राशीच्या लोकांनी या राशीच्या व्यक्तीशी लग्न केले तर त्यांचे जीवन सुखी राहते.

मकर (ग्रहाचा स्वामी- शनि)

मकर राशीच्या लोकांचे लग्न या राशीच्या व्यक्तीसोबत झाले तर त्यांचे जीवन सुखी राहते आणि त्यांचे वैवाहिक जीवन यशस्वी होते.

कुंभ (ग्रहाचा स्वामी- शनि)

या राशीचे लोकं मेहनती असतात. या दोघांचे लग्न झाले तर त्यांचे आयुष्य आनंदात जाते.

मीन (ग्रहांचा स्वामी- स्वामी)

मीन राशीच्या लोकांचे लग्न त्याच राशीच्या लोकांशी झाले तर त्यांचे वैवाहिक जीवन सुखी राहते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....