AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology : पती आणि पत्नी दोघांचीही एकच रास असेल तर काय होते? राशीनुसार असे होतात परिणाम

  ज्योतिषशास्त्रामध्ये (Astrology) एकूण 12 राशींचा उल्लेख करण्यात आला आहे. सर्व राशींचे ग्रह स्वामी भिन्न आहेत आणि त्यांच्या आधारावर त्या त्या राशीच्या जातकाचा स्वभाव तयार होतो. चला तर जाणून घेऊया जर एकाच राशीच्या दोन व्यक्तींचे लग्न झाले तर त्यांचे वैवाहिक जीवन कसे असेल.

Astrology : पती आणि पत्नी दोघांचीही एकच रास असेल तर काय होते? राशीनुसार असे होतात परिणाम
जोतिशषास्त्रImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 15, 2023 | 4:40 PM
Share

मुंबई : हिंदू धर्मात लग्नासाठी शुभ मुहूर्त पाहणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच लग्नासाठी मुलगा आणि मुलगी यांच्या पत्रिका जुळणे आवश्यक आहे. याशिवाय मुलगा आणि मुलगी यांची राशी एकच नाही ना आणि असेल तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात याकडेही विशेष लक्ष देणे आवश्यक असते. आज आपण पती-पत्नीला लग्नानंतर समजले की त्यांची राशी सारखीच आहे तर त्याच प्रभावाबद्दल जाणून घेणार आहोत. किंवा एकाच राशीच्या मुला मुलीने लग्न करावे की नाही हे ही जाणून घेऊया.  ज्योतिषशास्त्रामध्ये (Astrology) एकूण 12 राशींचा उल्लेख करण्यात आला आहे. सर्व राशींचे ग्रह स्वामी भिन्न आहेत आणि त्यांच्या आधारावर त्या त्या राशीच्या जातकाचा स्वभाव तयार होतो. चला तर जाणून घेऊया जर एकाच राशीच्या दोन व्यक्तींचे लग्न झाले तर त्यांचे वैवाहिक जीवन कसे असेल.

मेष (ग्रहाचा स्वामी- मंगळ)

ज्योतिष शास्त्रानुसार या परिश्रमी राशी मानल्या जातात.असे म्हटले जाते की जर या लोकांनी एकमेकांशी लग्न केले तर जीवन आनंदी राहते.

वृषभ (ग्रह स्वामी शुक्र)

या राशीच्या दोन लोकांचे लग्न झाले तर त्यांचे जीवन प्रेमाने भरलेले असते. असे म्हणतात की हे दोघे प्रेमाने राहतात. त्यांचे वैवाहिक जीवन अतिशय कार्यक्षमतेने शुभ मार्गाने जाते.

मिथुन (ग्रहाचा स्वामी- बुध)

जर या राशीच्या दोन लोकांचे लग्न झाले तर त्यांच्या जीवनात आनंदाची कमतरता नसते. याचे कारण म्हणजे ही राशी थोडी शांत असली तरी जास्त काळजीत राहते. त्यामुळेच त्यांचे आयुष्य नीट घालवता येत नाही.

कर्क (ग्रहाचा स्वामी-चंद्र)

ज्योतिष शास्त्रानुसार जर या दोघांचे लग्न झाले तर त्यांच्यात वादविवाद आणि अस्वस्थता वाढेल.

सिंह (ग्रहाचा स्वामी-सूर्य)

सिंह राशीच्या दोन लोकांमध्ये वैवाहिक जीवन असेल तर काही परिस्थितींमध्ये वाद होऊ शकतात, परंतु सामान्यतः त्यांचे जीवन आनंदी राहते.

कन्या (ग्रहाचा स्वामी- बुध)

कन्या राशीच्या दोघांचे  एकमेकांशी लग्न केले तर त्यांच्यात असंतोषाची भावना निर्माण होते.

तूळ (ग्रहाचा स्वामी- शुक्र)

या राशीचे लोक त्यांच्या आयुष्यात आनंदी असतात. त्यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी राहते.

वृश्चिक (ग्रहाचा स्वामी- मंगळ)

जर दोघेही या राशीचे असतील तर बहुतेक वाद त्यांच्यातच होतात. एवढेच नाही तर चिंता आणि तणावाचा सामना करावा लागतो.

धनु (ग्रहांचा स्वामी- स्वामी)

जर धनु राशीच्या लोकांनी या राशीच्या व्यक्तीशी लग्न केले तर त्यांचे जीवन सुखी राहते.

मकर (ग्रहाचा स्वामी- शनि)

मकर राशीच्या लोकांचे लग्न या राशीच्या व्यक्तीसोबत झाले तर त्यांचे जीवन सुखी राहते आणि त्यांचे वैवाहिक जीवन यशस्वी होते.

कुंभ (ग्रहाचा स्वामी- शनि)

या राशीचे लोकं मेहनती असतात. या दोघांचे लग्न झाले तर त्यांचे आयुष्य आनंदात जाते.

मीन (ग्रहांचा स्वामी- स्वामी)

मीन राशीच्या लोकांचे लग्न त्याच राशीच्या लोकांशी झाले तर त्यांचे वैवाहिक जीवन सुखी राहते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर
फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री!
Uddhav Thackeray | फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री! आज शिर्डीत मोठं शक्तिप्रदर्शन
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं