Gemstone : या रत्नांमुळे बलवान होतो शुक्र, बुध आणि शनि, प्राप्त होते यश आणि समृद्धी

जर कन्या आणि राशीच्या लोकांना खूप प्रयत्न करूनही त्यांच्या कामात यश येत नसेल आणि त्यांना वारंवार अपयशाचा सामना करावा लागत असेल तर यामागे कमजोर शुक्र हे कारण असू शकते. शुक्र मजबूत करण्यासाठी, आपण प्लॅटिनमसह हिरा घालावा. हिरा शुक्राचे प्रतिनिधीत्व करतो, त्यामुळे शुक्रवारी हिरा धारण करावा. ज्ञानी लोकांच्या मते रत्ने धारण करणे शुभ मानले जाते.

Gemstone : या रत्नांमुळे बलवान होतो शुक्र, बुध आणि शनि, प्राप्त होते यश आणि समृद्धी
रत्नशास्त्र
Image Credit source: Social Media
| Updated on: Feb 23, 2024 | 12:00 PM

मुंबई :  ज्योतिषशास्त्रामध्ये (Astrology) रत्नांना विशेष महत्त्व आहे. रत्नशास्त्रामध्ये नऊ रत्नांची माहिती देण्यात आली आहे. हे रत्न नऊ ग्रहांचे प्रतिनिधीत्त्व करते अशी धार्मिक मान्यता आहे. रत्ने घातली तर भाग्याचे दरवाजे उघडतात असेही मानले जातात.कन्या राशीच्या लोकांसाठी कोणते रत्न आहेत, जे त्यांच्या नशिबाचे दरवाजे उघडू शकतात याबद्दल आपण जाणून घेऊया. जर पत्रिकेत  ग्रह कमजोर असतील तर त्यांची शक्ती वाढवण्यासाठी हे रत्न खूप प्रभावी आहेत. कन्या राशीच्या लोकांसाठी कोणते रत्न सकारात्मक राहतील आणि ते कोणते परिणाम देतील हे जाणून घेऊया.

हिरा

जर कन्या आणि राशीच्या लोकांना खूप प्रयत्न करूनही त्यांच्या कामात यश येत नसेल आणि त्यांना वारंवार अपयशाचा सामना करावा लागत असेल तर यामागे कमजोर शुक्र हे कारण असू शकते. शुक्र मजबूत करण्यासाठी, आपण प्लॅटिनमसह हिरा घालावा. हिरा शुक्राचे प्रतिनिधीत्व करतो, त्यामुळे शुक्रवारी हिरा धारण करावा. ज्ञानी लोकांच्या मते रत्ने धारण करणे शुभ मानले जाते. असे केल्याने, ते त्वरीत सक्रिय होतात आणि सकारात्मक परिणाम देतात. हिरा तुम्हाला आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यास मदत करतो. तुम्ही हिऱ्याचा वापर अंगठी किंवा पेंडेंट म्हणूनही करू शकता. हिरा धारण केल्याने प्रगती होते. व्यापाऱ्यांच्या व्यवसायात आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणातही सुधारणा होते. सोबतच रखडलेल्या कामांनाही गती मिळते.

पाचू

कन्या राशीच्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असेल आणि इतरांसमोर आपले मत मांडण्यात संकोच वाटत असेल तर बुध अशक्त असताना असे घडते. आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांनी सोन्यासोबत पन्ना रत्न धारण करावे. जर तुमची तब्येत वेळोवेळी खराब होत असेल तर तुम्ही पन्ना रत्न धारण करावे. पन्ना धारण करताच पत्रिकेतील बुध सक्रिय होतो. कन्या राशीच्या लोकांसाठी बुध हा त्यांचा स्वामी आहे, त्यामुळे बुध शुभ असल्याने नेहमीच शुभ मानले जाते. पन्ना रत्न धारण केल्याने कन्या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढतो. शरीरात पुरेशी प्रतिकारशक्ती असते, त्यामुळे हे लोक सहजासहजी आजारी पडत नाहीत. बुधवारी करंगळीत सोन्याच्या अंगठीत पन्ना घातला जातो.

नीलम

जर कन्या राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे समाधानकारक फळ मिळत नसेल तर निराश होणे स्वाभाविक आहे, परंतु तुम्ही आळशी बसू नये. तुम्हाला तुमच्या कार्यपद्धतीत बदल करावे लागतील आणि शनिवारी निळा नीलम रत्न धारण करावे. नीलम धारण केल्याने व्यक्तिमत्व वाढते.