वेळोवेळी बदलतात भविष्य सांगणाऱ्या हातावरच्या रेषा… जाणून घ्या यामागचे कारण

| Updated on: Jul 24, 2021 | 9:22 PM

जेव्हा एखाद्या मुलाचा जन्म होतो, तेव्हा त्याच्या हातातील रेषा खूपच बारीक असतात. त्या रेषा कालांतराने गडद होतात. आपल्या हातावरच्या रेषाही बदलतात किंवा आयुष्यभर तशाच राहतात का, हे अनेक लोकांना जाणून घ्यायचे असते.

वेळोवेळी बदलतात भविष्य सांगणाऱ्या हातावरच्या रेषा... जाणून घ्या यामागचे कारण
हाताचे तळवे सांगतात व्यक्तीचा स्वभाव
Follow us on

मुंबई : भविष्यात काय वाढून ठेवलेय, देव जाणो. अशी अनेकांची सर्वसाधारण भावना असते. आयुष्यात एका मागून एक संकटे सुरु झाली कि अशी प्रतिक्रिया अनेकांच्या तोंडून बाहेर पडते. दुसऱ्यांना असा अनुभव आल्यांनतर अनेकजण स्वतःच्या आयुष्यात असा धोका टाळण्यासाठी भविष्य जाणून घेण्याकडे वळतात. अनेकांना आपल्या भविष्याबद्दल जाणून घ्यायचे असते. वर्तमानात जगताना भविष्याविषयी जाणून घेणे ही अत्यंत साधारण इच्छा असते. याला संपूर्ण मानवजातीचा नैसर्गिक स्वभाव असल्याचे म्हटले जाते. भविष्य जाणून घेण्याचे भिन्न मार्ग आहेत. काहींचा हस्तरेखांवर विश्वास असतो, ते लोक ज्योतिष्यांना आपले हात दाखवतात आणि भविष्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. हस्तरेखा शास्त्रानुसार कोणत्याही मनुष्याचे संपूर्ण भविष्य हस्तरेखा शास्त्रातूनच कळते. हस्तरेखाच्या मदतीने एखाद्या व्यक्तीला त्याच्या संपूर्ण आयुष्याबद्दल जाणून घेता येते. (The lines on the fortune telling hand change from time to time, know the reason behind this)

वेळोवेळी हातावरील रेषा बदलतात

जेव्हा एखाद्या मुलाचा जन्म होतो, तेव्हा त्याच्या हातातील रेषा खूपच बारीक असतात. त्या रेषा कालांतराने गडद होतात. आपल्या हातावरच्या रेषाही बदलतात किंवा आयुष्यभर तशाच राहतात का, हे अनेक लोकांना जाणून घ्यायचे असते. जर तुमच्या मनातही असा प्रश्न निर्माण झाला असेल तर त्याचे उत्तर ‘होय’ आहे. आपल्या हातांच्या रेषा वेळोवेळी बदलत राहतात. तथापि, हस्तरेखा शास्त्र मात्र अचानक कधीच बदलत नाही, ते बदलण्यासाठी बराच वेळ लागतो.

हस्तरेखाशास्त्र भविष्याबद्दल अनेक महत्वाची माहिती देते

व्यक्तीच्या कर्मांनुसार त्या व्यक्तीच्या हस्तरेषा बदलतात. आपल्या हातांच्या रेषा आपल्या आयुष्यातील त्रास तसेच सुखी आयुष्याबद्दल सांगतात. आपल्या नशिबासंबंधी महत्त्वपूर्ण माहितीदेखील हस्तरेषांमधून मिळते. आपले विवाहित जीवन कसे असेल, आपल्याकडे किती पैसे असतील, आयुष्यात किती त्रास होईल, भविष्यात आपल्याला यश कधी मिळेल आदी गोष्टींबद्दल आपण हस्तरेषांच्या माध्यमातून आगाऊ माहिती मिळवू शकतो. त्याआधारे आपणाला आपल्या भविष्याचा अंदाज बांधता येतो.

अनेक लोकांना भविष्य जाणून घ्यायचे नसते

काही लोक हस्तरेखा शास्त्रावर खूप विश्वास ठेवतात, तर काही लोक त्यास केवळ शारीरिक स्वरुपाचा एक भाग मानतात. याखेरीज पुष्कळ लोक असे असतात, जे हस्तरेखा शास्त्रावर विश्वास ठेवतात, मात्र त्यांना ज्योतिषाकडे त्यांच्या हातांच्या रेषा दाखवून स्वतःचे भविष्य जाणून घ्यायचे नसते. वास्तविक, यामागे त्यांचा हेतू असा असतो की जर त्यांचे भविष्य उज्ज्वल असेल तर त्याचा सवयींवर परिणाम होईल. तसेच त्यांचे भविष्य चांगले नसेल तर त्यांच्या मनात कायम तणाव निर्माण होईल. (The lines on the fortune telling hand change from time to time, know the reason behind this)

इतर बातम्या

Kokan Flood and Landslide : उद्धव ठाकरे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी चिपळूणमध्ये

प्रचंड महागाई, मुलांच्या शिक्षणाचा आणि भविष्यातील लग्नाच्या खर्चाची चिंता सतावतेय? ‘या’ मार्गाचा अवलंब करा