AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ लोकांचा अपमान करण्याची चूक करताय, व्हा सावध, आचार्य चाणाक्य म्हणतात…

आचार्य चाणाक्य यांनी त्यांच्या चाणाक्य नीतीमध्ये अनेक अशा गोष्टी सांगितल्या ज्या आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहे. पण चाणाक्य म्हणतात तुम्ही जर अशा लोकांचा अपमान करण्याची चूक करत असाल, तर सावध व्हा..

'या' लोकांचा अपमान करण्याची चूक करताय, व्हा सावध, आचार्य चाणाक्य म्हणतात...
| Updated on: May 07, 2026 | 2:17 PM
Share

आज स्पर्धेच्या युगात सर्वांनाच पुढे जायचं असतं. मेहनतीच्या जोरावर अनेक जण यशाचं शिखल गाठतात. पण काहींची वागणूक मात्र योग्य नसते. यशाच्या शिखरावर पोहोचलं तरी. व्यक्तीने सर्वांसोबत चांगलं बोलणं आणि वागणं अपेक्षित आहे. चाणक्य नीतीनुसार , आपल्या वागणुकीचा आपल्या भविष्यावर परिणाम होतो. चाणक्याच्या मते, जीवनात यश मिळवण्यासाठी केवळ कठोर परिश्रमच नव्हे, तर चांगली वागणूक देखील अत्यंत महत्त्वाची आहे. आपली वागणूक चांगली असेल तरच आपण यश मिळवू शकतो आणि समाजात चांगले जीवन जगू शकतो. त्याचप्रमाणे, आचार्य चाणक्यांनी असा इशारा दिला आहे की, अहंकार बाळगून आयुष्यात काही लोकांचा अपमान केल्यास जीवनात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. तर, जाणून घ्या जीवनात कोणत्या लोकांचा अपमान करू नये.

या लोकांचा अपमान करण्याची चूक कधीही करू नका:

गुरूंचा अपमान करू नका: गुरूंशिवाय ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. गुरुंना कायम महत्त्वाचं स्थान असतं म्हणून, गुरूंचा कधीच अनादर करू नये. गुरूंच्या आज्ञा न पाळल्याने, त्यांचा अपमान केल्याने जीवनात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात आणि लोकांची थट्टा केल्याने किंवा त्यांना तुच्छ लेखल्याने जीवनात प्रगती होऊ शकत नाही, असे आचार्य चाणक्य सांगतात.

आई-वडील : आपण आपल्या आई-वडिलांचा कधीही अपमान करू नये. आचार्य चाणक्यांच्या मते, आपल्या आई-वडिलांचा अपमान करणे आणि वृद्धापकाळात त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हे पाप आहे. चाणक्य म्हणतात की, जर आपण आपल्या आई-वडिलांचे प्रेम आणि त्याग ओळखले नाहीत आणि त्यांना आदर दिला नाही, तर जीवनाला काही अर्थ उरत नाही.

सत्पुरुष : जे लोक धर्म आणि प्रामाणिकपणाच्या मार्गावर चालतात , त्यांचा आदर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चाणक्य म्हणतात की, अशा सत्पुरुषांचा आदर केल्याने मनाला शांती मिळते आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते.

ज्ञानी लोकांचा अपमान करू नये: चाणक्याच्या मते, अनुभवाचा खजिना आणि सखोल ज्ञान असलेल्या लोकांची संगत अनमोल असते. अशा व्यक्तींचा अपमान करणे हे बौद्धिक दारिद्र्याचे लक्षण आहे, ज्यामुळे माणूस उत्तम ज्ञान मिळवू शकत नाही

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत