
हिंदू धर्मात कोणत्याही पूजेमध्ये नारळ अर्पण करणे खूप महत्वाचे मानले जाते.नारळाला श्रीफळ असेही म्हणतात. प्रत्येक धार्मिक विधीमध्ये नारळ अनिवार्य असते. नारळ हे एक असे फळ आहे जे खूप पवित्र मानले जाते. देवाला नारळ अर्पण करणे शुभ मानले जाते.

कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात नारळ फोडून केली जाते. ही परंपरा शतकानुशतके चालत आली आहे.

पण हिंदू श्रद्धेनुसार महिला नारळ फोडू शकत नाही. महिलांनी नारळ का फोडू नये? त्यामागील कारण काय आहे? जाणून घेऊयात.

असे मानले जाते की त्रिदेव नारळात राहतात. नारळाच्या वरच्या भागावरील तीन डोळे हे भगवान शिवाच्या त्रिनेत्राचे प्रतीक आहेत. शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांनी नारळाचे झाड आणि कामधेनू पृथ्वीवर आणले. नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात.


शास्त्रांमध्ये असेही नमूद आहे की पृथ्वीवर पहिल्यांदाच भगवान विष्णूने देवी लक्ष्मीसोबत फळाच्या स्वरूपात नारळ पाठवला. नारळाला एक बीज मानले जाते आणि शास्त्रांनुसार, नारळ फोडणे म्हणजे बीज फोडण्यासारखे आहे.

जेव्हा मूल आईच्या गर्भात असते तेव्हा सुरुवातीला ते बीजासारखे असते. महिला मुलांना जन्म देतात. असे मानले जाते की त्या बीजाच्या रूपात मुलांना जन्म देतात. म्हणूनच महिलांनी कधीही नारळ फोडू नये. असे मानले जाते

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)