
आर्थिक नुकसान: चाणक्य नीतीनुसार, कोणीही बाहेरच्या व्यक्तीला आपले आर्थिक नुकसान कधीही सांगू नये. असे केल्यास मदत मिळण्याऐवजी तुम्ही निराशा होऊ शकता. तुमच्या समस्या ऐकून लोक तुमच्यापासून दुरावायला लागतील.सर्वांच्याच आयुष्यात विवंचना असतात, त्यामुळे समोरचा व्यक्ती आपलं ऐकून घेईलच असं नाही.

वैवाहिक जीवन - चाणक्य नीतीनुसार, वैवाहिक जीवन किंवा जीवनसाथीशी संबंधित कोणतीही वैयक्तिक बाबी कोणालाही सांगू नयेत. यामुळे लोकांची चेष्टा तर होईलच, पण भविष्यात वैवाहिक जीवनात कलह निर्माण होईल. हे वाद आपण कधीही मिटवू शकत नाही.

स्वतःचे त्रास स्वत: पर्यंत ठेवा - चाणक्य नीतीनुसार, तुमच्या आयुष्यातील त्रास इतरांना शेअर करणे टाळले पाहिजे. तुमची समस्या जाणून घेतल्यानंतर लोक तुमची थट्टा करतील. तुम्हाला त्यांच्या कडून कोणतीच मदत होणार नाही.

अपमान- चाणक्य नीतीनुसार, जर कोणी तुमचा अपमान केला असेल तर तो स्वतःकडेच ठेवावा. त्याबद्दल इतरांना सांगितल्याने त्या लोकांचा तुमच्याबद्दलचा आदर कमी होईल.