Chanakya Niti : या गोष्टींकडे कधीच करू नका दुर्लक्ष, कराल आयुष्यातील सर्वात मोठी चूक

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. चाणक्य म्हणतात आपल्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतात, ज्यांच्याकडे कधीही दुर्लक्ष करता कामा नये, जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर ती तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरू शकते.

Chanakya Niti : या गोष्टींकडे कधीच करू नका दुर्लक्ष, कराल आयुष्यातील सर्वात मोठी चूक
CHANKYA
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 11, 2026 | 9:27 PM

चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी जे विचार मांडले आहेत. ते आजच्या काळातही अनेकांना मार्गदर्शक ठरतात. चाणक्य यांनी मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूंवर आपल्या या ग्रंथामध्ये लिखाण केलं आहे. व्यक्ती आपल्या आयुष्यात दु:खी का असतो? हे सांगताना चाणक्य म्हणतात इतर कोणामुळेही नाही तर स्वत:मध्ये असलेल्या काही गोष्टींमुळे व्यक्तीच्या वाट्याला दु:ख येते. चाणक्य म्हणतात अनेकांना त्यांच्या आयुष्यात येणार्‍या समस्यांकडे दुर्लक्ष करण्याची सवय असते, असे लोक समस्या सोडवण्याऐवजी त्याच्याकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे ही समस्या सुटत नाही, व्यक्ती त्यामध्ये खोलवर गुंतला जातो आणि एक दिवस मोठ्या संकटात सापडतो. त्यामुळे चाणक्य म्हणतात समस्या कोणतीही असो, ती मुळापासून सोडवा, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. तसेच आयुष्यात अशा काही गोष्टी असतात, ज्याकडे दुर्लक्ष करू नका, असंही चाणक्य यांनी म्हटलं आहे, जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल?

कर्ज – चाणक्य म्हणतात जेव्हा तुमच्यावर कर्ज असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, त्यातून पूर्णपणे मुक्त व्हा, तुम्ही जर कर्जाकडे दुर्लक्ष केलं तर ते कर्ज वाढतच जाणार आहे, एक दिवस असा येईल की तुम्ही कर्जाच्या ओझ्याखाली पूर्णपणे दबून जाल, त्यामुळे कर्जाकडे कधीही दुर्लक्ष करू नका.

रोग – चाणक्य म्हणतात माणसानं आयुष्यात कधीही रोगाकडे दुर्लक्ष करू नये, कारण रोग जेव्हा नियंत्रणात असतो, तेव्हाच त्यावर डॉक्टरांकडून उपचार केले तर तुमचा जीव वाचू शकतो, अन्यथा तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता.

शत्रू – चाणक्य म्हणतात तुम्ही शत्रूकडे कधीही दुर्लक्ष करण्याची चूक करू नका, ही चूक तुम्हाला खूप महागात पडू शकते. तुम्ही बेसावध असाल तर तुमचा शत्रू कधीही तुमचा घात करू शकतो, त्यामुळे शत्रूकडे दुर्लक्ष करू नका.

वाईट संगत – चाणक्य म्हणतात तुम्हाला जेव्हा जाणीव होईल की तुम्ही कोणच्या तरी वाईट संगतीमध्ये आहात, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका, त्यातून हातात वेळ असेपर्यंतच बाहेर पडा, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)