AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, आता खतांचा तुटवडा दूर होणार, मोठी अपडेट समोर

पश्चिम आशियातील संघर्षामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी सागरी वाहतूक विस्कळीत झाली होती, परंतु वेळेवर केलेले नियोजन, उत्तम समन्वय आणि सततच्या देखरेखीमुळे खतांचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहिल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, आता खतांचा तुटवडा दूर होणार, मोठी अपडेट समोर
FARMER NEWS
| Updated on: Jul 05, 2026 | 11:17 PM
Share

रसायने आणि खते मंत्रालयाने म्हटले आहे की पश्चिम आशियातील संघर्षाने भारताच्या खतांच्या पुरवठा साखळीवर जास्त परिणाम झाला आहे. देशासाठी खते आणि कच्चा माल आणणारी २० पैकी १५ जहाजे सुरक्षितपणे होर्मुझ स्ट्रेटमधून निघाली आहेत. यात आठ जहाजांवर ३.३२ लाख टन युरिया, चार जहाजात २.५७ लाख टन डीएपी आणि तीन जहाजात १.११ लाख टन सल्फर आहे. हे सर्व निर्धारित वेळेनुसार भारतीय बंदरात येत आहेत. ५ आणखी जहाजे येणार असून ज्यातील एक जहाजात ०.२५ लाख टन अमोनिया आणि दुसऱ्यात ०.४५ लाख टन युरिया आहे.

सध्या आणखी दोन युरिया जहाजांवर आणि एका गंधक जहाजावर माल चढवला जात आहे. सर्व माल नियोजित वेळेनुसार पोहोचेल अशी अपेक्षा आहे. केंद्र सरकारने म्हटले आहे की, पश्चिम आशियातील संघर्षामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतील सागरी वाहतूक विस्कळीत झाली होती, परंतु वेळेवर नियोजन, उत्तम समन्वय आणि सततच्या देखरेखीमुळे खतांचा अखंड पुरवठा सुनिश्चित करण्यात आला आहे. राजनैतिक प्रयत्नांतून पुरवठ्याचे नवीन स्रोतही शोधण्यात आले असल्याचे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.

कोणत्या देशातून खतांचा पुरवठा

ओमान, मलेशिया, व्हिएतनाम, जॉर्जिया, नायजेरिया, रशिया, फिनलंड, इजिप्त, अल्जेरिया, तुर्की आणि नेदरलँड्स येथून युरियाच्या पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. भारताने डीएपी आणि एनपीके ( नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटेशियम ) रशिया, मोरोक्को, इजिप्त, अमेरिका, जॉर्डन, दक्षिण कोरिया, ट्युनिशिया आणि सौदी अरेबियायेथून अरबी समुद्र ते रेड सीच्या मार्गाने मागवला आहे. केंद्रीय रसायन आणि खते मंत्री जे. पी. नड्डा म्हणाले की, पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक पुरवठा साखळीवर गंभीर परिणाम झाला आहे, ज्यामुळे खतांच्या किंमती वाढल्या आहेत आणि निर्यातीसाठी लागणारा वेळ वाढला आहे. या परिणामातून भारतही सुटलेला नाही.

सर्व युरिया कारखाने पूर्ण क्षमतेने कार्यरत

जागतिक स्तरावर किंमती वाढल्या असूनही, सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण केले आहे. पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली खत विभागाने उचललेल्या सक्रिय उपाययोजनांमुळे हे शक्य झाले आहे. पश्चिम आशियातील संकटाच्या काळात खत कारखान्यांना होणारा नैसर्गिक वायूचा पुरवठा, जो सुमारे ६५ टक्क्यांनी कमी झाला होता, तो आता पूर्णपणे पूर्ववत झाला आहे. परिणामी, देशभरातील सर्व युरिया कारखाने पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याचे जे. पी. नड्डा यांनी म्हटले आहे.

Follow Us
उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात; पहा व्हिडीओ
Ramraksha Andolan Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात, पहा व्हिडीओ
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल; शंख नाद अन्...
धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी
kharghar | धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी दुर्घटना
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेता
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेत्यानेच समोर येत सस्पेन्स संपवला!
मोठी बातमी! 130 ज्येष्ठ शिवसैनिक ठाकरेंच्या भेटीला, तासभराच्या बैठकीत
मोठी बातमी! 130 ज्येष्ठ शिवसैनिक ठाकरेंच्या भेटीला, तासभराच्या बैठकीत काय घडलं? मातोश्रीवर घडामोडींना वेग
शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट! कृषीमंत्री माध्यमांसमोरच म्हणाले...
Dattatray Bharne | शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट! कृषीमंत्री माध्यमांसमोरच म्हणाले...
राज्यात मुसळधार पावासाचा आणखी एक बळी, CCTV तून धक्कादायक माहिती समोर
Kurla | राज्यात मुसळधार पावासाचा आणखी एक बळी, CCTV तून धक्कादायक माहिती समोर
काय राहिलंय आता? ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान
काय राहिलंय आता? राहिलेत ते... ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान चर्चेत
मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं...
Thane | मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं वातावरण
पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड
Mumbai | पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड