Narak Chaturdashi 2021 : नरक चतुर्दशीच्या दिवशी हे उपाय करा, हनुमानजी सर्व संकटं दूर करतील

| Updated on: Oct 28, 2021 | 11:36 AM

नरक चतुर्दशी 2021 हा सण कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. या दिवसाला नरक चौदस, रुप चतुर्दशी आणि छोटी दिवाळी असेही म्हणतात. या दिवशी हनुमान जयंतीही साजरी केली जाते. वाल्मिकींच्या रामायणानुसार, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला मंगळवारी हनुमानजींचा जन्म झाला होता.

Narak Chaturdashi 2021 : नरक चतुर्दशीच्या दिवशी हे उपाय करा, हनुमानजी सर्व संकटं दूर करतील
Hanuman ji
Follow us on

मुंबई : नरक चतुर्दशी 2021 हा सण कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. या दिवसाला नरक चौदस, रुप चतुर्दशी आणि छोटी दिवाळी असेही म्हणतात. या दिवशी हनुमान जयंतीही साजरी केली जाते. वाल्मिकींच्या रामायणानुसार, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला मंगळवारी हनुमानजींचा जन्म झाला होता.

अशाप्रकारे छोट्या दिवाळीचा दिवस म्हणजेच नरक चौदस हा हनुमानजींच्या पूजेसाठी अतिशय शुभ मानला जातो. हनुमानजी हे संकटनिवारक आहेत आणि ते सर्व प्रकारच्या समस्या दूर करु शकतात, असे मानले जाते की जर तुम्ही नरक चतुर्दशीच्या दिवशी काही उपाय केले तर समस्यानिवारक तुमच्या मोठ्या समस्या दूर करेल. यावेळी नरक चौदस बुधवार, 3 नोव्हेंबर रोजी येत आहे. येथे जाणून घ्या हनुमानजींना प्रसन्न करण्याचे उपाय, ज्याने तुमचे सर्व दुःख दूर होतील.

नरक चौदसला हे उपाय करा सर्व दु:ख दूर होतील

1. जर तुमच्या जीवनातील संकटांचा अंत होत नसेल. तुम्ही प्रयत्न करुन करुन हार मानली असेल, तर तुम्ही हनुमानजींना चोला अर्पण करा. चोला हनुमानाला खूप प्रिय आहे. ज्याने ते देऊ केले त्याचे सर्व त्रास ते दूर करतात. चोला अर्पण करताना श्रीरामाचे नामस्मरण करावे. याशिवाय, संकटमोचनाला बुंदी किंवा बेसनाचे लाडू अर्पण करा आणि एक नारळ डोक्यावरुन 7 वेळा उतरवल्यानंतर हनुमानजींच्या चरणी ठेवा. हा उपाय केल्याने तुमच्या जीवनात बरेच बदल होतील आणि हळूहळू तुम्हाला प्रत्येक संकटातून मुक्ती मिळू लागेल.

2. जर तुमच्या आयुष्यातील पैशांची चणचण संपण्याचे नाव घेत नसेल तर छोट्या दिवाळीच्या दिवशी पिंपळाच्या 11 पानांवर श्रीरामाचे नाव लिहून त्याचा हार बनवून हनुमानाला हार घालावा. तसेच, समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. तुमच्या अडचणी नक्कीच दूर होतील. याशिवाय, व्यवसायात लाभासाठी हनुमानजींना नारंगी रंगाचा लंगोट अर्पण करा .

3. तुमच्यावर वाईट वेळ आली असेल आणि शत्रू खूप वाढले असतील तर हनुमानजींना गुलाबाचा हार घाला. यानंतर एका नारळावर स्वस्तिक बनवा आणि हे नारळ हनुमानजींना अर्पण करा. त्यांना पाच देशी तुपाच्या चपात्या अर्पण करा. यामुळे तुमचा वाईट काळ लवकर संपेल आणि शत्रूपासून तुमची सुटका होईल.

4. हनुमानजींना विशेष पान खूप आवडते. हे त्यांना अर्पण करा आणि त्यात गुलकंद, बदाम, कतरी इत्यादी सर्व घाला. देव फक्त भक्ताच्या भावनांचा भुकेला असतो. जर तुम्ही त्यांना भावपूर्ण भावनेने हे अर्पण केले तर ते तुमची प्रत्येक तक्रार ऐकतील आणि ती दूर करतील.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Diwali 2021 : दिवाळीला अष्टलक्ष्मी साधना केल्यास पैशाशी संबंधित प्रत्येक इच्छा होईल पूर्ण

Diwali 2021 : दिवाळीला देवी लक्ष्मीसोबत भगवान विष्णूची पूजा का केली जात नाही? जाणून घ्या यामागचे कारण