AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘देवी लक्ष्मी’ चा आशीर्वाद मिळवण्यासाठी गरुड पुराणातील ‘या’ गोष्टी पाळा; कधीही जाणवणार नाही पैशांची कमी !

भारतातील 18 पुराणांपैकी एक, गरुड पुराणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व दिले गेले आहे. गरुड पुराणात अशा काही गोष्टी सांगीतल्या आहेत की, ज्याचा अवलंब करून तुम्ही घरातील पैशाची कमतरता दूर करू शकता आणि शांती मिळवू शकता.

‘देवी लक्ष्मी’ चा आशीर्वाद मिळवण्यासाठी गरुड पुराणातील ‘या’ गोष्टी पाळा; कधीही जाणवणार नाही पैशांची कमी !
प्रातिनिधिक छायाचित्र Image Credit source: Tv9
| Updated on: May 21, 2022 | 2:28 PM
Share

18 पुराणांपैकी एक, गरुड पुराणाला (Garuda Purana), हिंदू धर्मात विशेष महत्त्व दिले गेले आहे. जीवन समजून घेऊन ते सुरळीत चालवण्यासाठी अनेक महत्त्वाच्या गोष्टी या पुराणात सांगण्यात आल्या आहेत. असे मानले जाते की जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा गरुड पुराणाचे पठण करणे खूप शुभ असते. याचे पठण केल्याने मृत व्यक्तीच्या आत्म्याला (To the soul of the dead) शांती मिळते असे मानले जाते. हे पुराण मृत्यूनंतरच ऐकावे, असे म्हटले जाते. कारण मृत्यूनंतर आत्मा काही काळ भ्रामक स्थितीत असल्याचे मानले जाते. खरे तर गरुड पुराण हे असे पुराण आहे जे माणसाला सत्कर्म करण्याची प्रेरणा देते. यामध्ये जीवनाशी निगडीत अशा सर्व धोरणांबद्दल सांगितले आहे. तुम्हाला धर्माचा मार्ग यातून मिळतो. या पुराणाचे वैशिष्ट्य (Feature of Purana) म्हणजे त्यात भगवान विष्णूच्या भक्तीचे तपशीलवार वर्णन केले आहे. या पुराणातून भगवान विष्णूच्या भक्तीत लीन होऊन देवी लक्ष्मीला प्रसन्न करता येते.

देवाला नेवेद्य अर्पण करा

गरुड पुराणात देवाला अर्पण केल्याशिवाय अन्न खाऊ नये असे सांगितले आहे. असे म्हणतात की, ज्या घरात अन्न चाखण्यापूर्वी देवाला अर्पण केले जाते, त्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. दुसरीकडे, अन्न खोटे किंवा त्याचा अनादर केल्याने माता लक्ष्मी क्रोधित होऊ शकते. पुराणानुसार अन्न वाया गेल्याने घरात कलह निर्माण होतो.

धर्म कर्माचे ज्ञान असावे

गरुड पुराण या ग्रंथाच्या मजकुरात असे म्हटले आहे की प्रत्येक व्यक्तीने धार्मिक ग्रंथांमध्ये असलेले ज्ञान समजून घेतले पाहिजे. हे ज्ञान त्याला स्वतःला कळले तर तो इतरांनाही समजावून सांगू शकेल. असे मानले जाते की आपल्याला धर्म कर्माचे ज्ञान असले पाहिजे. जेव्हा हे घडते तेव्हा आपल्याला जीवनाचा खरा उद्देश समजतो आणि आपण योग्य दिशेने चालण्यास सक्षम होतो.

ध्यान, चिंतनाला महत्व

गरुड पुराणातही चिंतनाचा विशेष उल्लेख आहे. असे मानले जाते की ध्यान केल्याने समस्या दूर होतात. तपश्चर्या, चिंतन आणि ध्यान केल्याने मन शांत होते आणि रागही आपल्यापासून दूर राहतो. रागावर नियंत्रण ठेवणे म्हणजे जीवनात यश मिळवण्यासारखे आहे. फार कमी लोक हे करू शकतात, पण ते करणे खूप गरजेचे आहे.

 

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.